शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

बचतीत दडलाय प्रगतीचा मार्ग

By admin | Updated: October 30, 2014 22:31 IST

काटकसरीमध्ये प्रगतीचा मार्ग दडला असून देशाच्या हितासाठी प्रत्येकाने वीज, पाणी व इंधनाची बचत करणो आवश्यक आहे.

नामदेव मोरे - नवी मुंबई
काटकसरीमध्ये प्रगतीचा मार्ग दडला असून देशाच्या हितासाठी प्रत्येकाने  वीज, पाणी व इंधनाची बचत करणो आवश्यक आहे. 
देशातील इतर शहरांच्या तुलनेमध्ये नवी मुंबईमध्ये समाधानकारक सार्वजनिक सुविधा उपलब्ध होत आहेत. दळणवळण, पाणी व विजेची टंचाई शहरात भासत नाही. परंतु या सुबत्तेमुळे नागरिकांमधील निष्काळजीपणा वाढत आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीची उधळण सुरू आहे. नवी मुंबई महापालिकेने मोरबे धरण विकत घेतल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. शहरातील 65 टक्के परिसरात चोवीस तास पाणीपुरवठा होत आहे. शहरवासी रोज जवळपास 425 एमएलडी पाणी वापरत आहेत. मोठय़ा प्रमाणात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. उद्यानासाठीही पिण्याचा पाण्याचा वापर सुरू आहे. 
पाण्याप्रमाणो मुंबई, ठाणो, नवी मुंबईमध्ये विजेची मोठय़ा प्रमाणात उधळपट्टी सुरू आहे. शहरातील बाजारपेठा, मॉल्स व इतर ठिकाणी आवश्यकतेपेक्षा जास्त वीज वापरली जात आहे. शासकीय व खाजगी कार्यालयांमध्येही गरज नसताना वातानुकूलित यंत्रणा, पंखे सुरूच ठेवले जात आहेत. हे थांबविण्यासाठी आवश्यक वीज वापरणो आवश्यक आहे वीज, पाणी व इंधनाच्या बचतीमध्ये देशाच्या प्रगतीचा मार्ग दडला आहे. जबाबदारी ओळखून नैसर्गिक साधनसंपत्तीचा आवश्यक तेवढाच वापर करणो आवश्यक आहे.
 
च्प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. वाहने धुण्यासाठी व कुंडीतील झाडांना पाणी घालताना पाइपचा वापर करू नये. प्रसाधनगृहामध्ये फ्लशचा वापर करू नये. व्यावसायिक व घरगुती वापरासाठी आवश्यक तेवढेच पाणी वापरणो आवश्यक आहे.
 
च्पाण्याची उधळपट्टी करताना कोणी आढळून आले तर संबंधितांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती नवी मुंबई पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी दिली.
 
च्विजेचा अत्यंत काटकसरीने वापर करणो आवश्यक आहे. शहरांमध्ये अनावश्यक कामांसाठी विजेचा वापर होत असतो. शासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये वातानुकूलित यंत्रणा, पंख्यांचा वापर आवश्यक तेवढा करावा. दिवसा घर व कार्यालयांमध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश येईल अशी रचना असावी.
 
च्विजेची उपकरणो कमीत कमी वापरावी. विजेची उधळपट्टी कोणालाच परवडणारी नसून प्रत्येक नागरिकाने स्वत:चे कर्तव्य समजून एक -एक युनिट वीज वाचविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता ए. एम. थोरात यांनी केले आहे.