शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आखातातील भाज्यांची निर्यात ठप्प; १६८१ कोटींचा व्यापार संकटात : लिंबू, मिरची, शेवगा, भेंडीला असते मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 08:05 IST

मध्यपूर्वेतील युद्धामुळे या भाज्यांची निर्यात सध्या ठप्प झाली असून त्याचा थेट फटका देशातील शेतकऱ्यांना बसत आहे.

नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : भारतीय लिंबू, हिरवी मिरची, शेवगा, भेंडी आणि कारली यांसारख्या भाज्यांना आखाती देशांत वर्षभर मोठी मागणी असते. मात्र, मध्यपूर्वेतील युद्धामुळे या भाज्यांची निर्यात सध्या ठप्प झाली असून त्याचा थेट फटका देशातील शेतकऱ्यांना बसत आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारतातून सुमारे ३ लाख ७३ हजार टन भाजीपाला आठ आखाती देशांमध्ये निर्यात केला होता. या निर्यातीमधून १६८१ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह देशातील विविध कृषी बाजारपेठांमधून आखाती देशांकडे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पाठविला जातो. भाजीपाला निर्यातीत संयुक्त अरब अमिराती (यूएई) हा दीर्घकाळ प्रमुख बाजारपेठ राहिली आहे. सध्या बांगलादेशातून मागणी वाढल्याने यूएई दुसऱ्या क्रमांकावर गेले असले तरी आखाती देशांमध्ये भारतीय भाज्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

देशातून एकूण १२८ देशांमध्ये भाजीपाला निर्यात होत असून त्यातील सुमारे २३ टक्के हिस्सा आठ आखाती देशांचा आहे. या बाजारपेठेत भारतीय लिंबू, हिरवी मिरची, भेंडी, कोबी, फ्लॉवर, कांदा आणि शेवग्याच्या शेंगा यांना विशेष मागणी असते. मात्र, मध्यपूर्वेतील तणाव वाढल्यामुळे सागरी वाहतूक विस्कळीत झाली असून आखाती देशांकडे होणारी निर्यात मोठ्या प्रमाणात अडचणीत आली आहे. परिणामी निर्यातदारांना पर्यायी बाजारपेठांचा शोध घ्यावा लागत आहे.

२०२४ - २५ मधील भाजीपाला निर्यात 

देश       किंमत (कोटी)     निर्यात (टन) 
युएई         १०७३          २३८१२१ 
कुवेत          २०२          ४७१२३ 
कतार          १७७          ३७८८४ 
सौदी अरब      १२९          २६२५७ 
बहरीन       ९२          २०४१८ 
इराक           ६          ३६१३ 
इस्त्राईल        २          १८३ 
जॉर्डन          ०.६१          ८५


भारतातील लिंबू, मिरची, शेवगा, कारली आणि भेंडी यांना आखाती देशांमध्ये मोठी मागणी असते. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे या देशांकडे होणारी निर्यात सध्या थांबली आहे. इतर देशांकडे निर्यात सुरू असली तरी आखाती बाजारपेठेतील अडथळ्यामुळे व्यापारावर परिणाम होत आहे.
शंकर पिंगळे, संचालक, 
मुंबई बाजार समिती

English
हिंदी सारांश
Web Title : Gulf Vegetable Exports Halt; ₹1681 Crore Trade at Risk

Web Summary : Middle East tensions disrupt vegetable exports to Gulf countries, impacting Indian farmers. Exports worth ₹1681 crore, including lemons, chilies, and okra, are affected. UAE is a major market, though Bangladesh demand is rising. Exporters seek alternative markets due to disrupted sea routes.
टॅग्स :vegetableभाज्याUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर