शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी

By नारायण जाधव | Updated: May 6, 2026 05:43 IST

या निर्णयामुळे जमीनधारकांना मालकी हक्क बळकट करण्याची संधी मिळणार असून, शासनाच्या महसूल वाढीलाही मोठी चालना मिळणार आहे.

नारायण जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : राज्यातील ‘सिलिंग’ अंतर्गत मिळालेल्या शेतीजमिनींना (वर्ग-२) आता वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्याचा मार्ग अधिक स्पष्ट आणि सुलभ झाला आहे. या निर्णयामुळे जमीनधारकांना मालकी हक्क बळकट करण्याची संधी मिळणार असून, शासनाच्या महसूल वाढीलाही मोठी चालना मिळणार आहे.

पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

महसूल व वन विभागाने ४ मे २०२६ रोजी अधिसूचना काढून हे नवे नियम लागू केले. यामुळे जमीन व्यवहार, बँक कर्जप्रक्रिया आणि गुंतवणूक अधिक सुलभ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघाचे महासचिव प्रकाश बाविस्कर यांनी या निर्णयाचे स्वागत करताना, प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत राबवावी, अशी मागणी केली. आदिवासी लाभार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबवावी, तसेच जिल्हास्तरावर शिबिरे घेऊन मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सुचवले. अनेक कुटुंबांना नोंदणी प्रक्रिया गुंतागुंतीची वाटत असल्याने प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

जमिनीच्या अधिमूल्याचे दर क्षेत्रानुसार वेगवेगळे

यात अधिमूल्याचे दर क्षेत्रानुसार वेगवेगळे आहेत. महानगर आणि शहर परिसरात ३० टक्के, तर इतर भागात २५ टक्के अधिमूल्य आकारले जाणार आहे. वापर बदललेल्या जमिनींसाठी हा दर २० ते ३० टक्क्यांदरम्यान असेल.

बाजारमूल्य ५० लाखांपर्यंत असल्यास जिल्हाधिकारीच निर्णय घेऊ शकतात; त्यापेक्षा जास्त प्रकरणांसाठी शासनाची मंजुरी आवश्यक राहील.

मात्र, शासनाने अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि शुल्काबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यास या निर्णयाचा फायदा अधिक वेगाने जमीनधारकांपर्यंत पोहोचू शकतो.

तीन महिन्यांत पडताळणी

नव्या नियमानुसार, जमीन मिळाल्यापासून किमान १० वर्षे पूर्ण झाल्यानंतरच रूपांतरणासाठी अर्ज करता येणार आहे. जमीन वाटपाच्या अटींचे उल्लंघन नसणे आवश्यक असून, उल्लंघन असल्यास ते आधी नियमित करणे बंधनकारक आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागणार असून, तीन महिन्यांत पडताळणी आणि त्यानंतर १५ दिवसांत अंतिम आदेश देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांना गती मिळण्याची शक्यता आहे.

५० लाखांवरील प्रकरणांवर सरकारची मोहोर

जमिनीचे बाजारमूल्य ५० लाखांपेक्षा कमी असल्यास निर्णयाचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असेल. मात्र, ५० लाखांपेक्षा जास्त मूल्याच्या प्रकरणांना राज्य सरकारची पूर्वपरवानगी अनिवार्य केली आहे. यामुळे मोठ्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न दिसून येतो. मात्र, जमीन वाटपाच्या अटींचे उल्लंघन आढळल्यास आणि ते नियमित न केल्यास, जिल्हाधिकारी अर्ज फेटाळू शकतात. त्यामुळे अर्जदारांनी अटींची पूर्तता करणे आवश्यक ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Relief for Ceiling Landowners: District Collectors Empowered After 10 Years

Web Summary : Ceiling land (Class-2) in Maharashtra can now be converted to Class-1, simplifying ownership. District collectors decide on cases up to ₹50 lakh market value. Higher value cases need state approval. This move boosts revenue and eases land transactions after 10 years.
टॅग्स :Farmerशेतकरी