शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

बालेकिल्ला टिकवण्यात गणेश नाईक यांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 00:07 IST

Maharashtra Election 2019: राष्ट्रवादीसह मनसेच्या नवख्या उमेदवारांची मतेही लक्षवेधी

नवी मुंबई : ऐरोली मतदारसंघामध्ये माजी मंत्री गणेश नाईक यांनी ७८ हजार ४९१ मतांनी विजय मिळविला आहे. बालेकिल्ला टिकविण्यात नाईक परिवारास यश आले असले, तरी विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या उमेदवारांनी मिळविलेली मतेही लक्षवेधी ठरली आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या काळात ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या मतदारसंघामध्ये ऐरोलीचाही समावेश आहे. २०१४ च्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना उमेदवारीही जाहीर केली; परंतु बेलापूरमधून गणेश नाईकांना उमदेवारी दिली नाही, यामुळे वडिलांसाठी संदीप नाईक यांनी त्यांची उमेदवारी सोडली.

राष्ट्रवादी काँगे्रसला तुल्यबळ उमेदवार मिळाला नाही. यामुळे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी असलेले गणेश शिंदे यांना उमेदवारी दिली. मनसेने अखेरच्या क्षणी नीलेश बाणखेले यांना उमेदवारी दिली. नाईकांच्या तुलनेमध्ये सर्व उमेदवार कमकुवत वाटत होते. मतदारांमध्येही यंदा निरुत्साह दिसला असून फक्त ४२ टक्के मतदान झाले होते.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून गणेश नाईक यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यांना एकूण एक लाख १४ हजार ६४५ मते मिळाली. राष्ट्रवादी काँगे्रसचे गणेश शिंदे यांना ३६ हजार १५४ मते मिळाली. मनसेला २२ हजार ८१८ मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी व मनसेचे उमेदवार नवखे असूनही त्यांनी चांगली मते मिळविली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश ढोकणे यांनीही तब्बल १३ हजार ४२४ मते मिळविली आहेत. मतदारांचे स्थलांतर झाले नसते तर अजून कडवे आव्हान भाजपला मिळाले असते, अशी चर्चा सुरू झाली होती.

ऐरोलीमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळविल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. बेलापूर मतदारसंघामधील अनेक पदाधिकारीही जल्लोषात सहभागी झाले होते. २०१४ मध्ये निसटता पराभव झाल्याचे शल्य नाईक समर्थकांमध्ये होते. या वेळच्या निवडणुकीमध्ये मोठे मताधिक्य मिळाल्याने ढोल-ताशे वाजवून पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. माझी खासदार संजीव नाईक, संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार, माझी महापौर सागर नाईक, नगरसेवक सूरज पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय विकासकामे केली आहेत, यामुळे राज्यातील जनतेने विश्वास दाखवून निवडून दिले आहे. यापुढेही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू राहतील.
- गणेश नाईक,विजयी उमेदवार, ऐरोली

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019airoli-acऐरोलीBJPभाजपा