शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

बालेकिल्ला टिकवण्यात गणेश नाईक यांना यश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 12:07 AM

Maharashtra Election 2019: राष्ट्रवादीसह मनसेच्या नवख्या उमेदवारांची मतेही लक्षवेधी

नवी मुंबई : ऐरोली मतदारसंघामध्ये माजी मंत्री गणेश नाईक यांनी ७८ हजार ४९१ मतांनी विजय मिळविला आहे. बालेकिल्ला टिकविण्यात नाईक परिवारास यश आले असले, तरी विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या उमेदवारांनी मिळविलेली मतेही लक्षवेधी ठरली आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या काळात ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या मतदारसंघामध्ये ऐरोलीचाही समावेश आहे. २०१४ च्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना उमेदवारीही जाहीर केली; परंतु बेलापूरमधून गणेश नाईकांना उमदेवारी दिली नाही, यामुळे वडिलांसाठी संदीप नाईक यांनी त्यांची उमेदवारी सोडली.

राष्ट्रवादी काँगे्रसला तुल्यबळ उमेदवार मिळाला नाही. यामुळे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी असलेले गणेश शिंदे यांना उमेदवारी दिली. मनसेने अखेरच्या क्षणी नीलेश बाणखेले यांना उमेदवारी दिली. नाईकांच्या तुलनेमध्ये सर्व उमेदवार कमकुवत वाटत होते. मतदारांमध्येही यंदा निरुत्साह दिसला असून फक्त ४२ टक्के मतदान झाले होते.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून गणेश नाईक यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यांना एकूण एक लाख १४ हजार ६४५ मते मिळाली. राष्ट्रवादी काँगे्रसचे गणेश शिंदे यांना ३६ हजार १५४ मते मिळाली. मनसेला २२ हजार ८१८ मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी व मनसेचे उमेदवार नवखे असूनही त्यांनी चांगली मते मिळविली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश ढोकणे यांनीही तब्बल १३ हजार ४२४ मते मिळविली आहेत. मतदारांचे स्थलांतर झाले नसते तर अजून कडवे आव्हान भाजपला मिळाले असते, अशी चर्चा सुरू झाली होती.

ऐरोलीमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळविल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. बेलापूर मतदारसंघामधील अनेक पदाधिकारीही जल्लोषात सहभागी झाले होते. २०१४ मध्ये निसटता पराभव झाल्याचे शल्य नाईक समर्थकांमध्ये होते. या वेळच्या निवडणुकीमध्ये मोठे मताधिक्य मिळाल्याने ढोल-ताशे वाजवून पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. माझी खासदार संजीव नाईक, संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार, माझी महापौर सागर नाईक, नगरसेवक सूरज पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय विकासकामे केली आहेत, यामुळे राज्यातील जनतेने विश्वास दाखवून निवडून दिले आहे. यापुढेही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू राहतील.- गणेश नाईक,विजयी उमेदवार, ऐरोली

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019airoli-acऐरोलीBJPभाजपा