शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

'काँग्रेस-राष्ट्रवादीकडे दलित समाजाने फिरवली पाठ'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 2:03 AM

काँग्रेसच्या नेत्यांनी समाजाचा राजकारणातील प्रवेश रोखला

नवी मुबई : मराठवाड्यात दलित समाजाने राष्ट्रवादी-काँग्रेसकडे पाठ फिरवल्याचे मत राजकीय अभ्यासक डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी व्यक्त केले आहे. तर लोकसभेच्या १७ निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी समाजाचा संसदीय राजकारणातला प्रवास रोखल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाड्यातील निवडणुकीचा आढावा घेताना डोंगरगावकर यांनी एका निवेदनाद्वारे हे राजकीय विश्लेषण केले आहे. काँग्रेसला या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मोठा पराभव पत्करावा लागला आहे. तर गत निवडणुकीत जिंकलेल्या दोनही जागा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना राखता आलेल्या नाहीत, त्यामुळे राज्यात काँग्रेस खऱ्या अर्थाने वंचित झाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. दुसरीकडे मात्र एमआयएमने मराठवाड्यात औरंगाबादची जागा जिंकली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या नव्या पक्षाने केलेल्या युतीचे फळ एमआयएमला मिळाले आहे. त्यामुळे लोकसभेत खासदार असद्दुदीन ओवैसी यांना नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांची साथ मिळाली आहे. सध्या आगामी विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादीला सोबत घ्यायचे की नाही, अशी चर्चा काँग्रेसमध्ये सुरू आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावेच असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये वाढू लागला आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जवळपास १५ जागांवर एकूण ४२ लाख मते मिळवली आहेत. या मतांचा प्रभाव विधानसभेच्या २८८ जागांवर राहणार आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे सात जागांवर काँग्रेसला, दोन जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला तर एका जागेवर शिवसेनेला फटका बसला़ त्यावरून प्रकाश आंबेडकर यांच्या या नव्या पक्षाने लोकसभा निवडणकीत नऊ जागांवर तिसºया क्रमांकाची मते मिळवली असल्याचेही विश्लेषण डॉ. डोंगरगावकर यांनी केले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस