शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखड्यावर विशेष सभेत गोपनीय चर्चा; सभागृह परिसरात प्रवेशबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 00:13 IST

नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा प्रशासनाने तयार केला आहे.

नवी मुंबई : प्रशासनाने सर्वसाधारण सभेमध्ये मांडलेल्या विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. सभागृह परिसरात पत्रकारांसह नागरिकांनाही बंदी घातली होती. रात्री १० वाजेपर्यंत सभेचे कामकाज सुरू होते.

नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. या आराखड्यावर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. महापालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या सर्व सभांचे व विशेष सभांचे कामकाज पाहण्यासाठी पत्रकारांसह नागरिकांनाही प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रवेश दिला जातो; परंतु या सभेसाठी कोणालाही परवानगी देण्यात आली नाही. प्रेक्षक गॅलरी, पत्रकारकक्षाकडे कोणी जाऊ नये यासाठी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.

विकास आराखड्यास महासभेने मंजुरी दिल्यानंतर सूचना व हरकती मागविण्यासाठी तो प्रसिद्ध केला जाणार आहे. तेव्हा तो सर्वांना उपलब्ध होणार असून, तोपर्यंत तो गोपनीय ठेवण्यासाठी कोणालाही प्रवेश देण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. बेलापूर ते दिघापर्यंत प्रत्येक प्रभागामध्ये आराखड्यामध्ये कशाचा समावेश आहे याची माहिती सर्व नगरसेवकांना देण्यात आली. नगरसेवकांनी या आराखड्यामध्ये त्यांच्या प्रभागामध्ये काय हवे त्याविषयी सूचना मांडल्या.

प्रत्येक नोडमध्ये मैदान, उद्यान, आरोग्य व इतर सुविधांसाठी भूखंडांचे आरक्षण आहे का? याविषयी नगरसेवक दक्ष असल्याचे पाहावयास मिळाले. रस्ता रुंदीकरणासह इतर अनेक प्रकारच्या सूचना या वेळी करण्यात आल्या. सर्वपक्षीय नगरसेवकांनी आराखड्यामध्ये त्यांच्या पद्धतीने सूचना केल्या. विकास आराखड्यामध्ये सिडकोच्या अनेक भूखंड सामाजिक सुविधांसाठी आरक्षित करण्याची मागणी करण्यात आली. कोणत्या भूखंडावर काय आरक्षण असावे हेही सूचित करण्यात आले.

रात्री १० वाजेपर्यंत सभेचे कामकाज सुरू होते. या सभेनंतर नगरसेवकांची समिती नियुक्ती केली जाणार आहे. आराखड्यावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्यानंतर त्या हरकतींचे निराकरण ही समिती करणार आहे. यानंतर आराखडा अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

महापालिका क्षेत्राच्या भविष्याचा विचार करून विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. बैठकीमधील चर्चा गोपनीय राहवी, यासाठी सभेसाठी नगरसेवकांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता. महासभेच्या मंजुरीनंतर विकास आराखड्यावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत.
- जयवंत सुतार, महापौर, नवी मुंबई

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र