शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
5
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
6
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
7
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
8
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
9
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
10
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
11
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
12
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
13
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
14
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
15
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
16
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
17
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
18
Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
19
क्रेडिट कार्डने पैसे वाचवता येतात का? करा हजारो रुपयांची बचत; कोणते कार्ड नेमके कशासाठी वापरायचे?
20
शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज लादले, अजित पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 06:15 IST

भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. या सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. युती शासनाच्या चार वर्षांच्या कार्यकाळात राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज वाढले असल्याची टीका राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांनी केली आहे.

नवी मुंबई : भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. या सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. युती शासनाच्या चार वर्षांच्या कार्यकाळात राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज वाढले असल्याची टीका राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांनी केली आहे.
वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात कोकण विभाग राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सरकारची प्रशासनावर पकड नाही. राज्यात स्थिती विदारक असताना मुख्यमंत्री फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिलेली नाही. दुष्काळाची स्थिती असूनही दुष्काळ घोषित केला जात नाही. नोटाबंदीमुळे प्राप्त झालेल्या नकली नोटा आणि काळ्या पैशाचा हिशोब केंद्रीय अर्थमंत्री किंवा आरबीआयचे गव्हर्नरदेखील देत नाहीत. शासनाच्या निर्णयावर जनता खूश नाही. भाजपाचे अनेक ज्येष्ठ नेतेसुद्धा नाराज आहेत. सरदार वल्लभभाई पटेलांच्या स्मारकापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्नदेखील भाजपा सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. नोटाबंदी, आर्थिक मंदी, कर्जबुडवे यामुळे देशातील बँकांचा एनपीए ७ लाख ३४ हजार कोटींवर गेला असल्याचा आरोप पवार यांनी केला.
राज्य सरकारमध्ये सुमारे अडीच लाख जागा रिक्त आहेत. राष्ट्रवादीचे सरकार राज्यातील तरुणांना रोजगार देण्याच्या अनुषंगाने एकही जागा रिक्त राहणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. या सरकारविरोधात आंदोलन उभे करण्याची गरज असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
या मेळाव्याला सुनील तटकरे, गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, अनिकेत तटकरे, महापौर जयवंत सुतार, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, नवी मुंबई युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सूरज पाटील उपस्थित होते.

मुंबई कोणावाचून थांबणार नाही
संजय निरुपम यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता पवार यांनी सांगितले, ज्या राज्यात राहतो तेथील स्थानिकांच्या भावना दुखावण्याचे वक्तव्य कोणी करू नये. ठरावीक घटकांनी काम न केल्यास मुंबई बंद पडेल यात तथ्य नाही. मुंबई २४ तास चालणारे शहर आहे, विकासात सर्वांचा वाटा असतो. कोणा एकामुळे शहर थांबणार नाही.

पार्थ पवार यांची मेळाव्याला हजेरी
नवी मुंबईत आयोजित केलेल्या युवक राष्ट्रवादी काँगे्रसच्या मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार उपस्थित होते. व्यासपीठाऐवजी ते कार्यकर्त्यांमध्ये बसले होते. माजी मंत्री गणेश नाईक यांनी त्यांना व्यासपीठावर बोलावले. पार्थ यांची उपस्थिती चर्चेचा विषय बनला होता. पार्थ यांच्या राजकीय प्रवेशाबाबत अजित पवार यांना प्रश्न केला असता पक्षश्रेष्ठी याबाबत योग्य निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNavi Mumbaiनवी मुंबई