थोल थिरुमावलवन यांनी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यातील प्रोटोकॉलवर आक्षेप घेतला आहे. तमिळनाडूच्या परंपरेनुसार, सरकारी कार्यक्रमांची सुरुवात 'तमिळ थाई वलथू' या गीताने होते. मात्र, विजय यांच्या सोहळ्यात 'वंदे मातरम' आधी गायले, त्यानंतर राष्ट्रगीत आणि शेवटी राज्यगीत वाजवण्यात आले.
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
थिरुमावलवन यांनी मुख्यमंत्री विजय यांनी त्यांच्या शपथविधी सोहळ्यात आधी 'वंदे मातरम' गायल्याबद्दल टीका केली. ते म्हणाले की, परंपरेनुसार तमिळनाडूतील सरकारी कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम 'तमिळ थाई वलथू' गायले जाते. विजय यांच्या सोहळ्यात आधी 'वंदे मातरम', त्यानंतर राष्ट्रगीत आणि मग 'तामिळ थाई वलथू' वाजवण्यात आले. त्यांनी विचारले, "हे राज्यपालांच्या इच्छेनुसार केले की केवळ त्यांना खूश करण्यासाठी?, असा सवाल त्यांनी केला.
कर्जावरून आर्थिक कलगीतुरा
मुख्यमंत्री विजय यांनी पदभार स्वीकारताच मागील सरकारवर १० लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा केल्याचा आणि तिजोरी रिकामी केल्याचा आरोप केला होता. यावर थिरुमावलवन यांनी त्यांना आर्थिक परिभाषेत प्रत्युत्तर दिले आहे. केवळ एकूण कर्जाचे आकडे दाखवून लोकांमध्ये भीती निर्माण करणे हा राजकीय डाव आहे. राज्याच्या कर्जाचे मूल्यांकन हे नेहमी राज्याच्या सकल उत्पादन दराच्या प्रमाणात केले पाहिजे. तामिळनाडूचे कर्ज अजूनही १५ व्या वित्त आयोगाच्या मर्यादेत असल्याचा दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्री विजय यांच्या तीन घोषणांचे कौतुक
थिरुमावलवन यांनी मुख्यमंत्री विजय यांच्या तीन प्राथमिक घोषणांचे स्वागत केले. यामध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेचा सामना करण्यासाठी उपाययोजना, महिलांची सुरक्षा आणि २०० युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठा यांचा समावेश होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांना तमिळनाडूच्या जनतेला आश्वासन देण्याचे आवाहन केले की, त्यांचे सरकार पूर्णपणे धर्मनिरपेक्ष असेल.
ते म्हणाले की, 'बदला'ची घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या विजय यांनी आता आपल्या शब्दांवर स्पष्टीकरण द्यावे, जेणेकरून मित्रपक्षांच्या आणि जनतेच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही.
Web Summary : Chief Minister Vijay faces immediate hurdles. Allies object to protocol changes during his oath. Criticism arose over prioritizing 'Vande Mataram' over the traditional Tamil anthem. Economic disputes and concerns about secular governance also surfaced. He is applauded for initiatives addressing addiction, women's safety and free electricity.
Web Summary : मुख्यमंत्री विजय को तत्काल चुनौतियों का सामना करना पड़ रहा है। सहयोगियों ने शपथ ग्रहण के दौरान प्रोटोकॉल परिवर्तन पर आपत्ति जताई। 'वंदे मातरम' को पारंपरिक तमिल गान से ऊपर प्राथमिकता देने पर आलोचना हुई। आर्थिक विवाद और धर्मनिरपेक्ष शासन के बारे में चिंताएं भी सामने आईं। नशे, महिला सुरक्षा और मुफ्त बिजली पर पहल की सराहना की गई।