शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
3
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
4
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
5
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
6
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
7
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
8
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
9
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
10
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
11
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
12
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
13
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
14
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
15
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
16
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
17
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
18
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
19
Trisha Krishnan: तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत झालेला साखरपुडा, लग्नही ठरलेलं, पण...
20
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
Daily Top 2Weekly Top 5

'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:08 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊर्जा बचतीसाठी केलेल्या आवाहनानंतर अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडले आहे.

पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक ऊर्जा बाजारावरील दबावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना तेल, गॅसचा वापर कमी करण्याचे आणि सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र, पंतप्रधानांच्या या आवाहनावरून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. "निवडणूक संपताच सरकारला संकट आठवू लागले आहे, पण खरं तर देशासाठी सर्वात मोठे संकट हे भाजपच आहे," अशा शब्दांत अखिलेश यांनी तोफ डागली आहे.

"प्रचार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने का नाही केला?"

पंतप्रधानांच्या आवाहनाचा समाचार घेताना अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे. त्यांनी विचारले की, "जर देशाला ऊर्जेची इतकीच चणचण होती, तर भाजपने निवडणुकीच्या काळात हजारो चार्टर्ड विमानांनी प्रवास का केला? भाजप नेत्यांनी त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रचार का केला नाही? त्यावेळी हे विमान इंधनावर चालत नव्हते की पाण्यावर?" सर्व निर्बंध फक्त सामान्य जनतेसाठीच का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सोन्याच्या खरेदीवरून भाजपवर निशाणा

पंतप्रधानांनी जनतेला सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. यावर अखिलेश म्हणाले की, "जनता तर महागाईमुळे आधीच दीड लाख रुपये तोळ्याचे सोने खरेदी करू शकत नाहीये. हे अपील पंतप्रधानांनी आपल्याच भ्रष्ट भाजप नेत्यांना करायला हवे, जे आपली काळी कमाई सोन्यात रूपांतरित करत आहेत. मग ते लखनऊ असो किंवा अहमदाबाद, सगळीकडे हेच सुरू आहे."

"परराष्ट्र धोरणात सरकार अपयशी"

देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीला भाजपचे चुकीचे परराष्ट्र धोरण जबाबदार असल्याचा आरोप अखिलेश यांनी केला. "भारताच्या पारंपारिक 'अलिप्ततावादी' धोरणापासून बाजूला होऊन काही विशिष्ट गटांच्या दबावाखाली चालल्यामुळे आज देशाला महागाई आणि बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. भाजपचे परराष्ट्र आणि गृह धोरण दोन्ही पूर्णपणे कोलमडले आहे," अशी टीका त्यांनी केली.

देशात भीतीचे वातावरण पसरवू नका!

अखिलेश यादव पुढे म्हणाले की, "सरकारचे काम संसाधनांचे नियोजन करून देशाला संकटातून बाहेर काढणे असते, अफवा किंवा भीती पसरवणे नाही. अशा आवाहनांमुळे बाजारात मंदी आणि महागाईची भीती निर्माण होईल, ज्यामुळे जनतेत अस्वस्थता वाढेल. जर तुम्हाला सरकार चालवता येत नसेल, तर आपले अपयश मान्य करा, देशाला उद्ध्वस्त करू नका."

English
हिंदी सारांश
Web Title : Akhilesh Yadav slams PM Modi's appeal after election ends.

Web Summary : Akhilesh Yadav criticizes PM Modi's appeal to reduce fuel and gold consumption, questioning the timing after elections. He accuses BJP of hypocrisy and fostering economic instability through flawed policies.
टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा