शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
5
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
6
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
7
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
8
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
9
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
10
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
11
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
12
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
13
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
14
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
15
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
16
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
17
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
18
Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
19
क्रेडिट कार्डने पैसे वाचवता येतात का? करा हजारो रुपयांची बचत; कोणते कार्ड नेमके कशासाठी वापरायचे?
20
शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
Daily Top 2Weekly Top 5

‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:07 IST

Nagpur : नव्वदच्या दशकात संपूर्ण देशाला वेड लावणाऱ्या “तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे…” या अजरामर गीताचे गीतकार जहीर आलम यांचे निधन झाले.

नागपूर : नव्वदच्या दशकात संपूर्ण देशाला वेड लावणाऱ्या “तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे…” या अजरामर गीताचे गीतकार जहीर आलम यांचे निधन झाले. आपल्या शब्दांनी लाखो रसिकांच्या मनात घर करणारे जहीर भाई मात्र आयुष्यभर उपेक्षित आणि आर्थिक विवंचनेत राहिले. त्यांच्या निधनाने नागपूरच्या साहित्य-संगीत विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

मोमीनपुरा परिसरातील एका छोट्याशा घरात राहणारे जहीर आलम यांच्याबद्दल अनेक नागपूरकरांनाही माहिती नव्हती. देशभर गाजलेल्या गीताचे लेखक आपल्या शहरात अत्यंत साधेपणाने आणि संघर्षात जीवन जगत आहेत, याची कल्पना फार थोड्या लोकांना होती.

एका गाण्याने देश वेडा झाला

१९९० च्या दशकात “तुम तो ठहरे परदेसी…” हे गाणे अक्षरशः प्रत्येकाच्या ओठांवर होते. पानठेले, हॉटेल्स, बसस्थानके, गल्लीबोळ सर्वत्र हेच गाणे ऐकू यायचे. गायक अल्ताफ राजा एका रात्रीत सुपरस्टार झाला. मात्र त्या गीतामागचे शब्द रचणारे जहीर आलम मात्र प्रकाशझोतात आले नाहीत.

विशेष म्हणजे हे गाणे सुरुवातीला कव्वाली गायिका किरण पाटणकर आपल्या कार्यक्रमांमध्ये सादर करीत असत. नंतर अल्ताफ राजाने ते गायले आणि एका म्युझिक अल्बममध्ये त्याचा समावेश झाला. सुरुवातीला अल्बमला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र वर्षभरानंतर त्याच अल्बमला “तुम तो ठहरे परदेसी” हे नाव देऊन पुन्हा बाजारात आणण्यात आले आणि त्यानंतर इतिहास घडला.

लोकप्रियतेतून पैसा सर्वांना, पण गीतकार मात्र रिकाम्या हाताने

या गाण्यामुळे गायक, संगीतकार आणि म्युझिक कंपनीला मोठा आर्थिक फायदा झाला. मात्र जहीर आलम यांच्या वाट्याला अत्यंत किरकोळ मानधन आले. एवढे लोकप्रिय गीत लिहूनही त्यांची गरिबी दूर झाली नाही, ही खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती.

एम्प्रेस मिलमध्ये काम करणारे जहीर भाई मिल बंद पडल्यानंतर आर्थिक संकटात सापडले. साहित्य आणि गीतलेखनाची प्रतिभा असूनही त्यांना स्थैर्य मिळाले नाही. मुंबईत संगीतकार नौशाद यांच्यासह अनेक मान्यवरांना त्यांनी भेटी दिल्या, पण त्यातून फारसा फायदा झाला नाही.

एका चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेले गाणे प्रचंड गाजले. मात्र चित्रपटातील इतर गाणी एका नामवंत गीतकाराची असल्याने, “गीतकार म्हणून फक्त माझेच नाव जाईल,” अशी अट घालण्यात आली. अखेर निर्मात्याने जहीर भाईंना केवळ तीन हजार रुपये दिले आणि त्यांचे गीत दुसऱ्याच्या नावावर प्रदर्शित झाले.

छोट्या घरात मोठा माणूस

जहीर आलम यांच्या साधेपणाचा अनुभव त्यांना भेटलेल्या अनेकांनी घेतला. मोमीनपुरातील अरुंद गल्लीत असलेल्या त्यांच्या छोट्याशा घरात बसायलाही जागा नव्हती. पाहुण्यांसाठी ते समोरच्या परिचिताच्या घरी बसण्याची व्यवस्था करीत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही पाहुणचारात मात्र त्यांनी कधी कमी पडू दिले नाही. निघताना स्वतःची सायकल घेऊन पाहुण्यांना मुख्य रस्त्यापर्यंत सोडायला येणारे जहीर भाई मनाने मात्र अत्यंत श्रीमंत होते.

शब्दांतून उमटलेली वेदना

त्यांच्या अनेक रचनांमध्ये त्यांच्या आयुष्याची वेदना उमटत असे. त्यांच्या एका गीतातील ओळी आज विशेष हळव्या वाटतात —
“शहर का मौसम ठीक नहीं है,
लौट चलो अब गाँव…”
आज जहीर आलम खऱ्या अर्थाने अखेरच्या प्रवासाला निघून गेले आहेत. मात्र त्यांच्या शब्दांचा आवाज कायम जिवंत राहील.

English
हिंदी सारांश
Web Title : ‘Tum To Thahre Pardesi’ lyricist Zaheer Alam passes away in poverty.

Web Summary : Zaheer Alam, lyricist of the famous song ‘Tum To Thahre Pardesi,’ died in poverty despite his song's massive success. The song made others rich, but he remained financially struggling. His death is mourned in Nagpur's literary circles.
टॅग्स :nagpurनागपूर