शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

'महामारीतील तुमचा इंटरेस्ट कमी झालाच पाहिजे, पण महामारीचा तुमच्यातील होत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 4:28 PM

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६३२८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तामिळनाडूमध्ये ४३४३, दिल्लीमध्ये २३७३, कर्नाटकात १५०२ तर तेलंगणामध्ये १२१३ जणांना बाधा झाल्याचे आढळले

ठळक मुद्देमहाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६३२८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तामिळनाडूमध्ये ४३४३, दिल्लीमध्ये २३७३, कर्नाटकात १५०२ तर तेलंगणामध्ये १२१३ जणांना बाधा झाल्याचे आढळलेअभिनेता अतुल कुलकर्णीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका वाक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील सध्याची परिस्थिती अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे.

मुंबई - देशात गुरुवारी प्रथमच कोरोनाचे २० हजार ९०३ रुग्ण आढळून आले असून, त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ६ लाख २५ हजार ५४४ झाला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या पाच राज्यांमध्ये २४ तासांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, नागरिकांमध्ये कोरोनाचे गांभीर्य राहिले नसल्याचे दिसून येते. देशात घोषित करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये कोरोनाचे गांभीर्य सर्वत्र दिसून येत होते. मात्र, हळू हळू कोरोना महामारीतील लोकांचा इंटरेस्ट, गांभीर्य कमी होताना दिसत आहे. 

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६३२८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तामिळनाडूमध्ये ४३४३, दिल्लीमध्ये २३७३, कर्नाटकात १५०२ तर तेलंगणामध्ये १२१३ जणांना बाधा झाल्याचे आढळले. आंध्रात रुग्णांची संख्या ८४५ ने वाढली. या सहा राज्यांतील रुग्णांची संख्या १७ हजारांच्या आसपास आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या तब्बल १ लाख ८६ हजार ६२६ झाली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण जूनमध्ये वाढले आणि १ जून ते २ जुलै या काळात ४ लाख ३५ हजार जणांना संसर्ग झाल्याचे चाचण्यांतून दिसून आले. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. कारण, लोकांमध्ये कोरोनाचे गांभीर्य दिसून येत नाही. सरकारच्या सूचनांचं किंवा प्रशासनाच्या नियमांचं पालन नागरिकांकडून होताना दिसत नाही. 

अभिनेता अतुल कुलकर्णीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका वाक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील सध्याची परिस्थिती अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे. कोरोना महामारीबद्दल सध्या लोकांमध्ये गांभीर्य दिसत नसून देश अनलॉक झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. तर, लोकांमध्ये कोरोनाची भीतीही राहिली नसल्याचं दिसून येत आहे. त्यावरुन अतुल कुलकर्णीने इंग्रजीतील एक वाक्य लिहिले आहे. महामारीतील आपला इंटरेस्ट कमी झालाच पाहिजे, पण महामारीचा तुमच्यातील रस कमी होणार नाही, असे वाक्य लिहित, द इकॉनॉमिस्ट या वृत्तपत्राचा संदर्भही अतुल कुलकर्णीने जोडला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणात बोलताना, कोरोनासोबत जगायची आपली तयारी आहे, पण कोरोनाची तयारी आहे का आपल्याला सोबत घेऊन जगू द्यायची, असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांचे हे वाक्य चर्चेचा विषय बनले होते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAtul Kulkarniअतुल कुलकर्णी