नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, आज(दि.4) लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय राज्य मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्यात संसदेच्या आवारात तीव्र शाब्दिक वाद झाला. या वादादरम्यान राहुल गांधींनी बिट्टू यांना ‘गद्दार’ म्हटले, तर त्यावर प्रत्युत्तर देताना बिट्टू यांनी राहुल गांधींना ‘देशाचा शत्रू’ संबोधले. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप करण्यात आले असून, प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.
झटापटीचा प्रयत्न केला...
केंद्रीय राज्य मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना आरोप केला की, राहुल गांधी त्यांच्याशी झटापट करण्याचा प्रयत्न करत होते. व्हिडिओ पाहिलात तर दिसेल की, ते माझ्याकडे येत होते. वेणुगोपाल आणि सुखजिंदर सिंह रंधावा यांनी त्यांना थांबवले.
बिट्टू पुढे म्हणाले, माझ्या डोक्यावर गुरुंची पगडी आहे. मी पंजाबचा आहे. मी कसा कुणासमोर झुकू शकतो? हात मिळवण्याची गोष्टच नाही. ते माझ्या मागे येण्याचा प्रयत्न करत होते, पण इतर खासदारांनी त्यांना अडवले.
सभागृहातही तणाव; सभापतींचा हस्तक्षेप
बिट्टू यांच्या म्हणण्यानुसार, हा वाद संसद भवनाच्या आतही सुरूच राहिला. मी सभागृहात जात असताना त्यांनी तिथेही अशीच वागणूक दिली. अखेर सभापतींनी त्यांना बाहेर पाठवले. बाहेरही त्यांनी रस्त्यावरील गुंडांसारखे वर्तन केले, असा आरोपही बिट्टू यांनी केला.
शीख समाजावर लक्ष्य केल्याचा आरोप
रवनीत सिंह बिट्टू यांनी गांधी कुटुंबावर गंभीर आरोप करत म्हटले की, गांधी कुटुंबाने नेहमीच शीख समाज आणि पगडीधारी लोकांना लक्ष्य केले आहे. या वादादरम्यान इतर कोणत्याही खासदाराने हस्तक्षेप केला नाही, असेही त्यांनी नमूद केले.
1984 च्या दंग्यांचा उल्लेख
बिट्टू यांनी राहुल गांधींवर थेट टीका करत म्हटले, तुम्ही देशातील सर्वात मोठे गद्दार आहात. तुम्ही शीखांचे मारेकरी आहात. तुमच्या गुंडांनी या देशात हजारो शीखांची हत्या केली. आमच्या सर्वात पवित्र गुरुद्वाऱ्यात तोडफोड केली, असेही बिट्टू म्हणाले.
Web Summary : A heated exchange in Parliament saw Rahul Gandhi call Bittu a traitor. Bittu retaliated, calling Gandhi an enemy and accusing the Gandhi family of targeting Sikhs and involvement in the 1984 Sikh massacre, escalating tensions.
Web Summary : संसद में राहुल गांधी ने बिट्टू को गद्दार कहा। बिट्टू ने पलटवार करते हुए गांधी को दुश्मन कहा और गांधी परिवार पर सिखों को निशाना बनाने और 1984 के सिख नरसंहार में शामिल होने का आरोप लगाया, जिससे तनाव बढ़ गया।