शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी यंदाचे वर्ष सर्वात वाईट; क्रिसीलचे भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 23:02 IST

शेती क्षेत्र ठरेल तारणहार

नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे जगभरातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसला आहे. भारतीयअर्थव्यवस्थाही मंदीकडे वाटचाल करीत आहे. चालू आर्थिक वर्ष हे आर्थिक विकासात सर्वात वाईट वर्ष ठरण्याची भीती क्रिसील या पतमापन संस्थेने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर शून्याखाली पाच एवढा कमी होण्याची भीतीही व्यक्त केली गेली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या चालू वर्षातील वाटचालीबद्दलचा अहवाल क्रिसीलने प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये वरील भाकीत करण्यात आले आहे. या वर्षामध्ये पाऊस हा नेहमीप्रमाणे होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून त्याच्या आधारे शेतीचे उत्पादन चांगले येण्याची अपेक्षा या अहवालात गृहित धरण्यात आली आहे. शेती उत्पादनातील समाधानकारक प्रगतीने आर्थिक विकासाचा दर काहीसा वाढल्याचे क्रिसीलने स्पष्ट केले आहे.

एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत विकास दर २५ टक्क्यांपर्यंत आक्रसण्याची भीती या अहवालात आहे. या तिमाहीतच अर्थव्यवस्थेचे सर्वाधिक नुकसान संभवते. पुढील तिमाहीत सेवा क्षेत्र, शिक्षण आणि पर्यटन या क्षेत्रांना फटका बसण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

तीन वर्षे राहू शकेल मंदीचा प्रभाव

च्कोरोनाचा अर्थव्यवस्थेला बसणारा फटका खूप मोठा असणार आहे. यामुळे एकूण देशांतर्गत उत्पादनातील सुमारे १० टक्के रक्कम ही कायमस्वरूपी कमी होणार असल्याची शक्यता या अहवालात क्रिसीलने व्यक्त केली आहे. मंदीच्या या प्रभावातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागण्याची भीतीही वर्तविण्यात आली.

च्भारताच्या ६९ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत केवळ तीनवेळा मंदीचा सामना अर्थव्यवस्थेला करावा लागला आहे. आर्थिक वर्ष १९५८, १९६६ आणि १९८० यामध्ये मंदी असल्याचे आकडेवारीवरून दिसते. यावेळी पावसाने डोळे वटारल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. यंदा मात्र परिस्थिती उलट आहे. यावेळी शेतीचे उत्पन्न चांगले येण्याची अपेक्षा असून, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बसणारा एकूण फटका काही प्रमाणात कमी होण्याची शक्यताही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था