शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 20:18 IST

Akhilesh Yadav on Yogi Modi: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा पारा चढला असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या टीकेनंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पलटवार केला. 

Bihar Vidhan Sabha Election: बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा धडाडत असून, विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना लक्ष्य करत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाआघाडीच्या नेत्यांना 'पप्पू, टप्पू आणि अप्पू' डिवचले. त्यावरून माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पलटवार केला. आम्हाला बिहारला गप्पू आणि चप्पूपासून वाचवायचे आहे, असे यादव म्हणाले. 

दरंभगामध्ये झालेल्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाआघाडीच्या नेत्यांना तीन माकड म्हणत टीका केली. राहुल गांधी, तेजस्वी यादव, अखिलेश यादव यांना पप्पू, टप्पू आणि अप्पू असे म्हणत योगींनी निशाणा साधला. 

जे लोक आरसा बघून येतात, त्यांना...

योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या टीकेला अखिलेश यादव यांनी उत्तर दिले. अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, "जे लोग आरसा बघून येतात, त्यांना सगळीकडे माकडेच दिसतात. माकडांच्या टोळीत बसवले तर वेगळे दिसत नाहीत."

सिवानमध्ये झालेल्या प्रचारसभेतही अखिलेश यादव यांनी भाजप नेत्यावर हल्ला चढवला साधला. "आम्हाला बिहारला गप्पू आणि चप्पूपासून वाचवायचे आहे. एनडीएला बिहार तारण ठेवायचे आहे. ते घाबरलेले आहेत. तेजस्वी यादव यांच्या नोकऱ्या देण्याच्या आणि महिलांना २५०० सन्मान निधी देण्याच्या घोषणेमुळे ते चिंताग्रस्त आहेत", अशी टीका अखिलेश यादव यांनी केली.  

भाजपला त्यांच्या अपयशांवर चर्चा नकोय 

"भाजप गप्पू प्रकरण आहे. भाजपने चंद्रावर जमीन देण्याचा, बँकेत १५ लाख जमा करण्याचा आणि कोट्यवधी नोकऱ्या निर्माण करण्याचे वचन दिले होते. हे तेच लोक आहेत, ज्यांना अमेरिकेने घाव घातला आहे. अमेरिका त्यांना घाबरवत आहे.. त्यामुळे ते अशा प्रकरच्या मार्गाचा वापर करत आहेत की, जेणेकरून विधानसभा निवडणुकीत त्यांच्या अपयशांची चर्चा होऊ नये. भाजपकडे गप्पू आणि चप्पू आहे आणि बिहारची जनता यावेळी समता निवडेल", असे योगी आदित्यनाथ म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Akhilesh Yadav Retorts: Save Bihar from 'Gappu and Chappu'

Web Summary : Akhilesh Yadav countered Yogi Adityanath's 'Pappu, Tappu, Appu' jibe during Bihar election campaigning. Yadav urged people to save Bihar from 'Gappu and Chappu,' accusing BJP of unfulfilled promises and diverting attention from failures. He highlighted Tejashwi Yadav's job creation pledge.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५yogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAkhilesh Yadavअखिलेश यादव