शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

केंद्रीय कृषिमंत्री तोमर म्हणतात, होत असलेला विरोध केवळ राजकीय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 8:11 AM

आंदोलकांची पोलिसांशी झटापट; केंद्राचे संघटनांना पत्र

एस.के. गुप्तानवी दिल्ली : नव्या कृषी कायद्याच्या विरोधात गुरुवारी पंजाबहून दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना पंजाब-हरयाणा सीमेवर अडवण्यात आले. शेतकऱ्यांनी उग्र प्रदर्शन केल्यावर त्यांची पोलिसांशी झटापटही झाली.  केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पंजाबच्या या शेतकऱ्यांचे हे वर्तन राजकारणाने प्रेरित असल्याचे म्हटले. तोमर म्हणाले, नव्या कृषी कायद्यात शेतकऱ्यांचे हित जपले आहे. मंडयांत त्यांचे होणारे शोषण थांबवण्यासाठी आणि आपले पीक एमएसपीपेक्षाही जास्त भावाने विकण्याची पूर्ण संधी त्यांना दिली गेली आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव सुधांशू पांडेय यांनी पंजाबमधील ३२ शेतकरी संघटनांना पत्र लिहून नव्या कृषी सुधारणा कायद्यांतील शंका दूर करण्यासाठी चर्चेला निमंत्रित केले आहे. शेतकरी नेत्यांची ही चर्चा मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासोबत  होईल. तोमर म्हणाले की, राज्यांना हवे असेल, तर ते त्यांच्याकडील मागणीनुसार राज्याच्या कृषी कायद्यांत दुरुस्ती करून एमएसपीची तरतूद करू शकतात. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी बोलायला मी तयार आहे. देशात शेतकरी केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी सुधारणा कायद्यांना विरोध करीत नाहीत. हा विरोध विरोधी पक्षांकडून होत आहे. कारण एमएसपी जुन्या किंवा नव्या कृषी कायद्यात लिहिली गेली आहे, असेही तोमर म्हणाले.सरकार अधिकृत निवेदनात एमएसपी कायम राखून मंडया बंद न होण्याचे आश्वासन देत आहे. 

शेतकऱ्यांचे आंदोलन यासाठी...n एमएसपी संपण्याची भीती. कारण मंडईच्या बाहेर पीक विकण्याचा मार्ग मोकळा केला गेला.n सरकारने विधेयकात मंडया संपवण्यात येईल, असे म्हटलेले नाही.n विना कर शेतकरी मंडईच्या बाहेर जेव्हा पीक विकेल तेव्हा मंडईची गरज संपून जाईल. दुसरे म्हणजे शेतकऱ्यांना विनामंडई एमएसपी कशी मिळेल? - शेतकरी असा युक्तिवाद करीत आहेत की, अडते किंवा व्यापारी त्यांचे ६-७ टक्के कराचे नुकसान न करता मंडईतून बाहेर खरेदी करतील. यामुळे शेतकऱ्यांचे शोषण वाढेल.n कंत्राटी शेतीत शेतकऱ्यांचा कोर्टात जाण्याचा हक्क काढून घेण्यात आला आहे. कंपन्या आणि शेतकरी यांच्यातील वादावर एसडीएम निर्णय घेईल.

टॅग्स :agricultureशेतीministerमंत्रीFarmerशेतकरी