शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 09:31 IST

भारतीय लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी दिल्लीत झालेल्या स्फोटावरून पाकिस्तानचे वाभाडे काढले. दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर लष्करप्रमुखांनी हे विधान केले.

"पाकिस्तानला आता कळून चुकलं आहे की, भारताला समोरासमोर युद्ध लढून हरवू शकत नाही. त्यामुळेच तो प्रॉक्सी वॉर करून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे काम करत आहे. दिल्लीत झालेला स्फोट त्याच प्रयत्नांचा भाग होता", असे विधान करत भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेचे वाभाडे काढले.

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे नवी दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या पदवीप्रदान सोहळ्यात बोलत होते.

लष्करप्रमुख जनरल द्विवेदी म्हणाले, "पाकिस्तानला आता हे कळून चुकले आहे की, भारतासोबत थेट युद्ध करून हरवू शकत नाही. त्यामुळे तो प्रॉक्सी वॉर आणि खोटी लढाई लढत आहे. याच प्रयत्नातून तो भारतात अस्थिर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे."

"दिल्लीमध्ये झालेला बॉम्बस्फोट अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नांचाच भाग होता. पाकिस्तानला काही करून त्याचं अस्तित्व दाखवायचं आहे. पण, आनंद आहे की, आजचा भारत बदलेला आहे. भारताने हा घातपात आधीच ओळखला आणि वेळीच कारवाई केली. त्यांना भारताच्या कानाकोपऱ्यात बॉम्बस्फोट करायचे होते आणि आपली शहरे, ज्यामध्ये मुंबईही आहे, त्यांच्या निशाण्यावर होती", असे जनरल द्विवेदी म्हणाले.

२२ मिनिटात अड्डे उद्ध्वस्त केले

जनरल द्विवेदी म्हणाले, "ऑपरेशन सिंदूर एक विश्वसनीय मोहीम होती. त्यातील प्रत्येक सदस्याने पूर्ण समन्वय ठेवून आपापली जबाबदारी पार पाडली. याच समन्वयामुळे भारतीय सशस्त्र दलाने २२ मिनिटातच नऊ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केले."

"ऑपरेशन सिंदूर बदलल्या परिस्थितीचे अचूक आकलन करून कारवाई करण्याच्या भारतीय लष्कराच्या क्षमतेचे एक उदाहरण होते. हा काही अचानक घेतलेला निर्णय नव्हता. अनेक वर्षे या गोष्टीचा विचार केल्याचा परिणाम होता. गुप्तचर यंत्रणा, अचूकता आणि तंत्रज्ञान हे सगळे एकत्र आणून कारवाई केली जाऊ शकते", असे द्विवेदी म्हणाले.

लष्करप्रमुख द्विवेदी म्हणाले की, ही लष्करी कारवाई ७ मेच्या पहाटे सुरू झाली होती आणि पाकिस्तान तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये बनलेले दहशतवादी अड्डे या कारवाईच्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्यात आले होते. पाकिस्तानने भारतावर हल्ले केले होते, त्याचे प्रत्युत्तर म्हणूनही ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. दोन अण्वस्त्र सज्ज देशांमध्ये ८८ तास हा संघर्ष सुरू होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan can't win war, resorts to proxy war: Army Chief

Web Summary : Army Chief General Dwivedi slams Pakistan, stating it uses proxy wars to destabilize India after failing in direct combat. The Delhi blast was part of this effort. Operation Sindoor showcased India's capability to destroy terror camps in response to Pakistani attacks.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक