शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल; "आता तुम्ही हिंदू..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:39 IST

मुख्यमंत्री आदित्यनाथ, तुम्ही आमच्या भूमिकेचे आणि परंपरेचे प्रमाणपत्र मागितले. आम्ही ते तुम्हाला सहजतेने दिले. कारण सत्य पुराव्याला घाबरत नाही. पण आता आम्ही नव्हे तर तुम्ही पुरावे देण्याची वेळ आहे असं स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे.

वाराणसी - प्रयागराज माघ मेळ्यात निर्माण झालेला वाद आता स्वामी अविमुक्तेश्वरानंद काशीत आल्यानंतरही संपला नाही. आमचं प्रमाणपत्र तर तुम्ही मागितले आता मुख्यमंत्री योगी यांनी त्यांचे हिंदू असल्याचं सिद्ध करावे असं सांगत त्यांनी योगींवर हल्लाबोल केला आहे. धर्म आणि सत्ता यात निर्णायक परीक्षेचा काळ आला आहे. स्वतंत्र भारतात गोमातेचे रक्षण आणि गोहत्या बंदी कायद्याची मागणी करणे सर्वात मोठा गुन्हा ठरला आहे. त्यामुळेच ज्यांनी ज्यांनी गोसंरक्षणासाठी आवाज उचलला त्यांना सरकारने दाबण्याचा प्रयत्न केला. १९६६ साली गोरक्षा आंदोलन झाले त्यावेळीही तत्कालीन सरकारने किती गोभक्त संतांना गोळ्या मारल्या याची आठवणही अविमुक्तेश्वरानंद यांनी करून देत सरकारवर निशाणा साधला.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय की, धर्मसम्राट स्वामी करपात्री महाराज यांच्यासह प्रमुख सनातनींवर अत्याचार करण्यात आले. गोसंरक्षणासाठी आम्ही आवाज उचलला म्हणून अन्याय करण्यात आला. इतकेच नाही तर आमच्या शंकराचार्य असण्याचे प्रमाणही मागण्यात आले. आमची प्रतिमा मलिन करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले गेले. या सर्वांचे नेतृत्व योगी आदित्यनाथ त्यांचे विश्वस्त रामभद्राचार्य आणि इतरांच्या माध्यमातून केले. या अत्याचाराने विचलित न होत समस्त सनातनीकडून गोरक्षणाचा संकल्प आणखी दृढ केला आहे. तुम्ही आमचे प्रमाण मागितले तर आता मुख्यमंत्री योगी यांनी ते हिंदू असल्याचे सिद्ध करावे. धर्माला सत्तेच्या प्रमाणपत्रांची गरज नाही पण सत्तेला आता त्यांची धार्मिक निष्ठा सिद्ध करावी लागेल असं त्यांनी सांगितले.

तसेच मुख्यमंत्री आदित्यनाथ, तुम्ही आमच्या भूमिकेचे आणि परंपरेचे प्रमाणपत्र मागितले. आम्ही ते तुम्हाला सहजतेने दिले. कारण सत्य पुराव्याला घाबरत नाही. पण आता आम्ही नव्हे तर तुम्ही पुरावे देण्याची वेळ आहे. संपूर्ण सनातनी समुदाय आता तुमच्या हिंदू असल्याचा पुरावा मागतो. हिंदू असणे केवळ भाषणे किंवा भगवे रंगापुरते मर्यादित नाही, त्याची परीक्षा गोसेवा आणि धर्माचे रक्षण आहे असं सांगत स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी योगी आदित्यनाथ यांना आव्हान दिले आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात गोमातेला राज्यमातेचा दर्जा द्या. मीट निर्यातीवर बंदी आणा. निर्यातीच्या नावावर गाईची कत्तल करणे रोखा. भारतात एकूण मांस निर्यातीपैकी उत्तर प्रदेशचा वाटा ४० टक्क्याहून अधिक आहे. म्हशीच्या मांसाच्या आड हे षडयंत्र होत आहे. बिना डिएनए चाचणीशिवाय म्हशीच्या मांस नावाखाली गोवंश कापले जात आहेत. आम्ही सरकारला ४० दिवसांची मुदत देत आहोत. सरकारने त्यांच्या धोरणांवर विचार करावा. जर गोमातेला राज्यमातेचा दर्जा आणि निर्यात बंदीचा आदेश काढला नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. येत्या १०-१९ मार्च या काळात लखनौ येथे संपूर्ण संत समाजाचा कार्यक्रम होईल. तेव्हा आम्ही मुख्यमंत्र्‍यांना बोगस हिंदू घोषित करू. जे सरकार गोवंशाचे रक्षण करू शकत नाही त्याला हिंदू म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार नाही असंही अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Swami Avimukteshwaranand Challenges Yogi Adityanath to Prove His Hindu Identity

Web Summary : Swami Avimukteshwaranand demands Yogi Adityanath prove his Hindu identity after questioning the Swami's credentials. He criticizes the government's inaction on cow protection and meat exports, threatening to declare Adityanath a 'fake Hindu' if demands aren't met within 40 days. Saints will gather in Lucknow to decide.
टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथHinduहिंदू