शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
4
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
5
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
6
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
7
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
8
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
9
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
10
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
11
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
12
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
13
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
14
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
15
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
16
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
17
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
18
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
19
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
20
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानी मतदारांनी केले राणीचे गर्वहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 06:37 IST

निकालाच्या आदल्या दिवसापर्यंत भाजपाच विजयी होईल आणि आपणच मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ, अशा गर्वात फिरणाऱ्या वसुंधरा राजे यांचे राजस्थानी मतदारांनी गर्वहरण केले.

- सुहास शेलार

निकालाच्या आदल्या दिवसापर्यंत भाजपाच विजयी होईल आणि आपणच मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ, अशा गर्वात फिरणाऱ्या वसुंधरा राजे यांचे राजस्थानी मतदारांनी गर्वहरण केले. बेरोजगारी, आरक्षण, कर्जमाफी अशा विविध मुद्द्यांवरून येथील सर्वसामान्य जनता वेळोवेळी रस्त्यावर उतरली. मात्र, राजे सरकारने दडपशाहीच्या मार्गाने ही आंदोलने परतून लावली. त्यामुळे जनसामान्यांमध्ये वसुंधरा राजे सरकारबद्दल नाराजी होती. त्याचा थेट परिणाम मतदानावर दिसून आला.

वसुंधरा राजे यांच्या संमतीशिवाय राजस्थानच्या मंत्रिमंडळातून एकही फाइल पुढे सरकत नव्हती. राजेंव्यतिरिक्त इतर कोणत्याही नेत्याला निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. या एकछत्री कारभारामुळे ग्रामीण भागातील विकासकामांना मोठ्या प्रमाणात खीळ बसली. साहजिकच याचा जाब सर्वसामान्य जनता सत्ताधारी आमदारांना विचारत होती. त्यामुळे स्वपक्षीय आमदारच राजे यांच्या कारभारावर नाराज होते. त्यामुळे बऱ्याच ज्येष्ठ नेत्यांनी राजेंच्या एकछत्री कारभाराला कंटाळून बंडखोरी केली. यामुळे मतांचे ध्रुवीकरण झाल्याने भाजपावर पराभवाची नामुष्की ओढवली.

२०१३ च्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात वसुंधरा राजे यांना अपयश आले. रोजगार, शिक्षणाच्या आधुनिक सुविधा पुरवण्यात असमर्थ ठरल्यामुळे राजस्थानच्या गल्लीगल्लीत नवयुवक ‘मोदी तुझसे बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं’ अशा घोषणा देत होते. हे जनमनात होते, ते मतदानात परावर्तित झाले.

दुसरीकडे, राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू सरदार सचिन पायलट यांनी गेल्या तीन-चार वर्षांत काँग्रेसच्या तद्दन कार्यपद्धतीत बदल करीत वसुंधरा राजे यांना वेळोवेळी घेरण्यास सुरुवात केली. शिवाय गावागावात फिरत कार्यकर्त्यांचा विश्वास जिंकला. युवकांना काँग्रेसकडे सक्षम पर्याय म्हणून पाहण्यास भाग पाडले. राणीने मात्र पायलट यांच्या या रणनीतीला ‘बचपना’ असेच नाव दिले. काँग्रेसची रणनीती कमी लेखण्याची वृत्ती हेच राणीच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. याखेरीज राज्यातील नेतृत्व मोठे ठरल्याने मोदींची खप्पामर्जी, अमित शहा यांना न जुमानण्याची वृत्तीही राजेंना भोवली, हे निकालातून दिसून आले.

तीन कारणांमुळे झाला काँग्रेसचा विजय
बेरोजगारी, आरक्षण, कर्जमाफी अशा विविध मुद्द्यांवरून जनसामान्यांमध्ये भाजपाविषयी असलेली नाराजी.
‘पद्मावत प्रकरणामुळे’ पारंपरिक मतदार राजपूतांनी भाजपाशी फारकत घेत काँग्रेसला दिलेले समर्थन.
भाजपाने केवळ एका मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिले. शिवाय पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा काढत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने मुस्लिमांची ओढवलेली नाराजी.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthanराजस्थानBJPभाजपाcongressकाँग्रेस