शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या संख्येत २५ टक्क्यांनी कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 06:04 IST

रेल्वे बोर्डातील अधिकाऱ्यांमध्ये २५ टक्क्यांनी कपात करून त्यांची संख्या २०० वरून १५० पर्यंत कमी करण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतला आहे.

नवी दिल्ली : रेल्वे बोर्डातील अधिकाऱ्यांमध्ये २५ टक्क्यांनी कपात करून त्यांची संख्या २०० वरून १५० पर्यंत कमी करण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतला आहे. अतिरिक्त ठरणाºया ५० अधिकाºयांच्या बदल्या झोनल रेल्वेमध्ये केल्या जातील. रेल्वे बोर्डाची पुनर्रचना करण्याची बराच काळ प्रलंबित असलेली योजना आता मार्गी लागणार आहे.

केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना २००० साली रेल्वे बोर्डाच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव पहिल्यांदा मांडण्यात आला होता. रेल्वे बोर्डाचा आकार आटोपशीर करण्यात यावा असा त्यामागे विचार होता. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, सध्या रेल्वे बोर्डामध्ये २०० अधिकारी आहेत. त्यांची संख्या १५०वर आणण्यात येईल.

अतिरिक्त ठरणाºया संचालक दर्जाच्या अधिकाºयांची झोनल रेल्वेमध्ये बदली केली जाईल. रेल्वे बोर्डामध्ये अनेक अधिकारी एकाच प्रकारचे काम करत असल्याचे निदर्शनास आले होते. झोनल रेल्वेची कार्यक्षमता वाढावी म्हणून तिथे वरिष्ठ अधिकारी असण्याची गरज होती. त्यादृष्टीनेही हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल.

भारतीय रेल्वेच्या कारभाराबद्दल नेमण्यात आलेल्या विवेक देब्रॉय समितीनेही २०१५ साली आपल्या अहवालात रेल्वे बोर्डाचा आकार आटोपशीर करण्याची सूचना केली होती. भारतीय रेल्वेचा कारभाराचे केंद्रीकरण झाले असून नोकरशाहीमुळे एकंदर कार्यसंस्कृतीवर परिणाम होत आहे. रेल्वे बोर्डात आवश्यकतेपेक्षा जास्त अधिकारीवर्ग असून त्यामुळे रेल्वेच्या कार्यक्षमतेवरही त्याचा विपरित परिणाम होत असल्याचे या समितीने म्हटले होते.

हे तर पहिले पाऊल

सूत्रांनी सांगितले की, रेल्वे बोर्डाच्या कारभाराचे कठोर परीक्षण करून तेथील अधिकाºयांच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय इतक्या वर्षांत कधीच घेण्यात आला नव्हता. या बोर्डातील २०० अधिकाºयांमुळे रेल्वेच्या तिजोरीवर पडणाºया बोजाचा कोणीही विचार केला नव्हता. तशी राजकीय इच्छाशक्ती कोणी दाखविली नव्हती; पण आता रेल्वे खात्याने तसे पाऊल उचलले आहे. रेल्वेचा कारभार आमूलाग्र सुधारण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्यातील हे पहिले पाऊल आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे