शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

करून दाखवले! Air India खासगीकरणातून सरकारची कटिबद्धता सिद्ध: PM नरेंद्र मोदी  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 9:18 AM

आम्ही मात्र सुधारणांसाठी वचनबद्ध आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी Air India खासगीकरणाबाबत बोलताना केले.

ठळक मुद्देआम्ही एअर इंडियाचे खासगीकरण करून दाखवलेसार्वजनिक क्षेत्राची गरज जिथे नसेल तिथे सरकारने काम करू नयेती क्षेत्रे खासगी उद्योगांना खुली करून द्यावीत, असेच आमचे धोरण आहे

नवी दिल्ली: अलीकडेच Air India च्या खरेदीसाठी लावण्यात आलेल्या बोलीमध्ये TATA ने बाजी मारली असून, तब्बल ६८ वर्षांनी एअर इंडियाची घरवापसी झाल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात देशभरातून प्रतिक्रिया आल्या. यानंतर एका कार्यक्रमात बोलताना, एअर इंडियाचे खासगीकरण करून दाखवले, यातून आम्ही आमची वचनबद्धता व गांभीर्य दाखवून दिले आहे. आतापर्यंत निर्णायक सरकारे कधीच नव्हती. आम्ही मात्र सुधारणांसाठी वचनबद्ध आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले.

नव्याने स्थापन करण्यात येत असलेली ‘इंडियन स्पेस असोसिएशन’ ही संस्था उद्योग क्षेत्राचा बुलंद आवाज बनेल व देशाची प्रगती या संस्थेच्या माध्यमातून साध्य होईल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. इंडियन स्पेस असोसिएशन ही संस्था देशांतर्गत व जागतिक संस्थांना अवकाश व उपग्रह तंत्रज्ञानात मदत करील. लार्सन टुब्रो, नेल्को, वन वेब, भारती एअरटेल, मॅप माय इंडिया, वालचंदनगर इंडस्ट्रीज, अनंथ टेक्नॉलॉजी लि. या संस्था यात काम करतील. गोदरेज, अझिस्ता बीएसटी एरोस्पेस प्रा. लि. बीइएल, सेंटम इलेक्ट्रॉनिक्स आणि मक्सार इंडिया यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

एअर इंडियाचे खासगीकरण करून दाखवले

आम्ही एअर इंडियाचे खासगीकरण करून दाखवले, यातून आम्ही आमची वचनबद्धता व गांभीर्य दाखवून दिले आहे. सार्वजनिक क्षेत्राची गरज जिथे नसेल तिथे सरकारने काम करू नये. ती क्षेत्रे खासगी उद्योगांना खुली करून द्यावीत, असेच आमचे धोरण आहे. अवकाशापासून संरक्षण क्षेत्रापर्यंत अनेक क्षेत्रे सरकारने आतापर्यंत खासगी क्षेत्राला खुली केली आहेत. देशाचे हितच सरकारने त्यात पाहिले असून त्यातील समाविष्ट घटकांच्या गरजांचा विचार केला आहे. भारताने मोठ्या प्रमाणावर सुधारणा राबवल्या असून आत्मनिर्भर भारतासाठी प्रयत्न केले आहेत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून 'गती शक्ती योजने'ची घोषणा केली होती. १०० लाख कोटी रुपयांची ही योजना आता लाँच करण्यात येणार आहे. या योजनेचा उपयोग देशातील रोजगाराच्या संधी सुधारण्यासाठी केला जाईल. प्रधानमंत्री गती शक्ती योजनेच्या माध्यमातून देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. ही योजना देशातील मास्टर प्लान आणि पायाभूत सुविधांचा पाया घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. या योजनेद्वारे स्थानिक उत्पादकांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवता येईल. यामुळे उद्योगांचा विकास होईल, असे सांगितले जात आहे.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाAir India Disinvestmentएअर इंडिया निर्गुंतवणूकCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी