शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाच राज्यांमधील पराभवावर मोदी पहिल्यांदाच बोलले; बघा काय म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 19:01 IST

नववर्षाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी एएनआय वृत्तसंस्थेला सविस्तर मुलाखत दिली.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या बालेकिल्ल्यांमध्ये काँग्रेसने भाजपाला हादरा दिला. तिन्ही राज्यांमधील सत्ता भाजपाला गमवावी लागली. या पराभवावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील पराभवासाठी १५ वर्षांची अँटी इन्कम्बन्सीही (सरकारविरोधी लाट) कारणीभूत असल्याचं सांगतानाच, आम्ही कुठे कमी पडलो यावर विचार करून पुढची आखणी करत असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं. या पराभवांमुळे पक्षाचं मनोधैर्य अजिबात खच्ची झालं नाही आणि २०१९ मध्ये जनता आम्हालाच विजयी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

नववर्षाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी एएनआय वृत्तसंस्थेला सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्यांनी राजकारणासंबंधीच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्याची सुरुवात झाली ती पाच राज्यांच्या निवडणूक निकालांपासून. मोदींच्या उत्तरांमधील ठळक मुद्दे....

>> तेलंगणा आणि मिझोरममध्ये भाजपा सत्तेवर येईल असा विचार मीही केला नव्हता आणि भाजपाच्या अन्य नेत्यांनाही तसं वाटत नव्हतं. 

>> छत्तीसगडमध्ये आमचा पराभव झाला, पण मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कुणालाच स्पष्ट बहुमत मिळालं नाही. 

>> १५ वर्षांची अँटी इन्कम्बन्सी घेऊन आम्ही मैदानात उतरलो होतो. त्याचा फटका छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये बसला. त्याशिवाय आम्ही कुठे कमी पडलो यावर चर्चा सुरू आहे, आखणी सुरू आहे.  

>> पण त्याचवेळी, हरियाणात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही जिंकल्या. त्रिपुरामध्ये ९०-९५ टक्के यश मिळवलं. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक निवडणुकांमध्येही लक्षणीय यश मिळालं. 

>> जिंकणं आणि हरणं हा एकच मानदंड नाही. 


>> मोदी लाट ओसरली असं म्हणणाऱ्यांचं अभिनंदन. कारण, मोदी लाट कधीतरी होती हे ते स्वीकारताहेत. 

>> देशात मोदी लाट वगैरे नाही, मोदी जिंकू शकत नाहीत, काही करू शकत नाहीत, असं २०१३-१४ मध्ये काही ठरावीक लोक बोलत होते. ते कोण लोक आहेत हे सगळ्यांना ठाऊक आहे. ते आजही तीच भाषा बोलताहेत. ज्यांच्यासाठी ते काम करतात, त्यांच्यासाठी त्यांना हे असं चित्र उभं करावंच लागतं. 

>> लाट ही फक्त आणि फक्त जनतेच्या आशा-आकांक्षांची असते. आपल्या आशा-आकांक्षा कोण पूर्ण करेल हे जनता ठरवते आणि त्याचीच लाट उसळते. आज जनतेत उत्साह आणि विश्वास आहे आणि जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. 


टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAssembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018