शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर काँग्रेसचं मौन; INDIA आघाडीतील मित्रपक्षांचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 19:46 IST

केंद्र सरकारने वक्फ बोर्डातील अधिकारांवर नियंत्रण आणण्यासाठी संसदेत सुधारणा विधेयक आणण्याची तयारी केल्याचं सांगितले जात आहे. 

नवी दिल्ली - वक्फ बोर्ड कायद्यात ४० पेक्षा अधिक दुरुस्ती करण्यात येऊ शकते. या दुरुस्ती विधेयकावर सध्या काँग्रेसनं मौन बाळगलं आहे परंतु इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांनी विरोध केला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं वक्फ बोर्डाच्या कामाचं समर्थन केले आहे. वक्फ बोर्ड अनेक शिक्षण संस्था, अनाथलय चालवतं असं त्यांनी म्हटलं तर संसदेत २ समाजात विभागणी होईल अशी कुठलीही चर्चा नको असं मत राष्ट्रीय जनता दलाने मांडले आहे. 

८ डिसेंबर २०२३ रोजी, वक्फ बोर्ड (अधिनियम) कायदा १९९५ रद्द करण्यासाठी एक खाजगी विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आले. हे विधेयक उत्तर प्रदेशचे भाजपा खासदार हरनाथ सिंह यादव यांनी मांडले. राज्यसभेत हे विधेयक मांडताना वाद झाला आणि हे विधेयक सभागृहात मांडण्यासाठी मतदानही झाले. त्यानंतर ५३ सदस्यांनी विधेयक मांडण्याच्या समर्थनार्थ मतदान केले तर ३२ सदस्यांनी विरोधात मतदान केले.

भाजपाची भूमिका काय?

हे विधेयक सादर करताना भाजपा खासदार म्हणाले होते की, वक्फ बोर्ड अधिनियम १९९५ हा समाजात द्वेष आणि फूट पाडत आहे. बोर्डाकडून त्यांच्याकडील अधिकारांचा गैरवापर केला जातो. समाजातील एकतेला छेद देतो. मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करून सरकारी, खासगी संपत्ती तसेच मठ, मंदिर यांच्यावरही मनमानीरित्या कब्जा करते. इतकेच नाही तर हा कायदा पीडितांना त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कोर्टात जाण्यापासूनही रोखतो असं खासदाराने म्हटलं होते. 

काँग्रेसनं राज्यसभेत केली होती मतविभागणीची मागणी

राज्यसभेत अनेक खासदारांनी या खासगी विधेयकाचा विरोध केला. काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी यावर मतविभागणीची मागणी केली. माकपानेही विधेयकाचा विरोध केला होता. हा एक संवेदनशील विषय असून समाजातील २ गटांमध्ये द्वेष पसरवू शकतो. त्यामुळे हे विधेयक संसदेत सादर करण्याची परवानगी द्यायला नको असं माकपा खासदार इलामारम करीम यांनी सांगितले. 

काय आहे प्रकरण?

शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने वक्फ अधिनियममध्ये ४० पेक्षा अधिक सुधारणांवर चर्चा झाली आहे. सूत्रांनुसार, यात वक्फ बोर्डाच्या अधिकाराची पडताळणी करण्याचीही दुरुस्ती आहे. कायद्यातील अनेक तरतुदी या मनमानीरित्या वापरल्या जातात. आता केंद्र सरकारकडून या अधिकारांवर काही निर्बंध आणण्याची शक्यता आहे. वक्फ बोर्डाच्या काही अधिकारांवर केंद्र सरकार नियंत्रण ठेवू इच्छिते. संसदेत सोमवारी हे वक्फ बोर्ड कायद्यातील सुधारणा विधेयक आणलं जाऊ शकते असं बोललं जात आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी