शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

हल्लेखोरांकडे पाकची शस्त्रास्त्रे

By admin | Updated: September 19, 2016 07:26 IST

भारतीय लष्कराच्या एका तळात घुसून आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी रविवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले

श्रीनगर/ नवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यात प्रत्यक्ष सीमारेषेपासून जवळच असलेल्या उरी शहरातील भारतीय लष्कराच्या एका तळात घुसून आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी रविवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले तर इतर १९ जखमी झाले. प्राणहानीच्या दृष्टीने अलीकडच्या काळातील लष्करी तळावरील हा सर्वांत भीषण हल्ला होता. हल्ल्यानंतर लष्कराने सुमारे तीन तास केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत चारही हल्लेखोरांचा खात्मा करण्यात आला. हे चारही हल्लेखोर पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे होते व त्यांच्याकडे पाकिस्तानी शस्त्रे होती, असे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाल्याने भारताविरुद्ध दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून यामागे असलेल्यांना धडा शिकविला जाईल, अशी ग्वाही दिली. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नियोजित दौरा रद्द करून दिल्लीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला व दहशतवादी पाकिस्तानला एकटे पाडण्याची गरज अधोरेखित केली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही तातडीने काश्मीरला जाऊन साद्यंत माहिती घेतली तर लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग यांनी हल्ल्याच्या ठिकाणाला भेट देऊन तेथील सज्जतेची पाहणी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)>दहा दिवसांपूर्वीच दिला होता अ‍ॅलर्ट सीमा ओलांडून पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांची नवी तुकडी काश्मीरमध्ये घुसली आहे व त्यांचे लक्ष्य उरी हे असू शकते, अशा स्पष्ट माहितीचा अ‍ॅलर्ट गुप्तचर संस्थांनी तीनच दिवसांपूर्वी दिला होता, असे माहितगार सूत्रांकडून समजते. श्रीनगरमधील लष्कराच्या १५व्या कॉर्पस््चे निवृत्त ध्वजाधिकारी व उरी येथील लष्करी तळाचे पूर्वी स्वत: कमांडर राहिलेले लेफ्ट. जनरल एस.ए. हसनैन यांनी तर टिष्ट्वटरवर याची जाहीर वाच्यताही केली. त्यांनी टिष्ट्वटरवर लिहिले की, दहाच दिवसांपूर्वी उरी येथील ब्रिगेड कमांडरना मी स्वत: असा हल्ला केव्हाही होऊ शकतो याविषयी सावध केले होते. दोन वर्षांपूर्वी उरी भागातीलच मोहरा येथील लष्करी छावणीवर असाच दहशतवादी हल्ला झाला होता. ते ठिकाण रविवारच्या हल्ल्यापासून जेमतेम १५ किमी अंतरावर आहे.>असा झाला उरी हल्लाउरी तळाच्या मागील बाजूस असलेल्या प्रशासकीय भागातून हे सशस्त्र दहशतवादी आत घुसले. तेथील मोकळ्या जागेत नव्याने आलेल्या तुकड्यांमधील सैनिकांसाठी तंबू व तात्पुरते निवारे उभारलेले होते. हल्लेखोरांनी रायफलींमधून अंदाधुंद गोळीबार करतानाच आगीचे लोळ फेकणारी शस्त्रे डागली. शहीद झालेल्या १७ जवानांपैकी १३-१४ जणांचा मृत्यू ते झोपलेल्या तंबूंना लागलेल्या आगीमुळे झाला. प्राणाहुती दिलेले बहुतांश जवान १० डोगरा आणि ६ बिहार रेजिमेंटचे होते. १९ जखमी जवानांना हेलिकॉप्टरने श्रीनगर येथील लष्कराच्या बेस इस्पितळात हलविण्यात आले.>चार एके-४७, रॉकेट लॉन्चर्स या हल्ल्याविषयी प्रसिद्धिमाध्यमांना माहिती देताना लष्कराचे डायरेक्टर जनरल आॅफ मिलिटरी आॅपरेशन्स (डीजीएमओ) लेफ्ट. जनरल रणबीर सिंग म्हणाले की, हे हल्लेखोर परकीय होते. यामागे जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याची आमची प्राथमिक माहिती आहे. लष्कराने केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत जे चार हल्लेखोर ठार झाले त्यांच्याकडे चार एके-४७ रायफल, अंडर बॅरेल रॉकेट लॉन्चर्स आणि अन्य प्रकारचे युद्धसाहित्य मिळाले. या सर्व शस्त्रांवर पाकिस्तानची मार्किंग्ज् आहेत. (म्हणजेच ही शस्त्रे पाकिस्तानी बनावटीची आहेत.)पाक म्हणतो, आमच्या माथी खापर नकोपाकिस्तानने मात्र या हल्ल्याशी आपला काहीही संबंध नाही. जरा काही खुट्ट झाले की कोणतीही शहानिशा न करता आमच्या माथी खापर फोडण्याची भारताला खोड जडली आहे, असा कांगावा करून हात वर केले.