शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 12:20 IST

राज्य सरकारने 2021 मध्ये सुरू केलेल्या ‘अत्यंत गरिबी निर्मूलन प्रोजेक्ट’ अंतर्गत 64,006 कुटुंब, अत्यंत गरीब म्हणून चिन्हांकीत केले होते. या चार वर्षांच्या योजनंतर्तगत या कुटुंबांना निवास, अन्न, आरोग्य आणि उपजीविकेशी संबंधित मदत पुरविण्यात आली.

शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत तर केरळची चर्चा होतेच. मात्र आता गरिबी निर्मूलनाच्या प्रयत्नांच्या बाबतीतही या राज्याने देशाचे लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी राज्य विधानसभेत घोषणा केली की, केरळने ‘अत्यंत गरिबी’ (Extreme Poverty) पूर्णपणे संपवली आहे. महत्वाचे म्हणजे, असा पराक्रम करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य आहे, असा दावाही वाम लोकशाही आघाडी (एलडीएफ) सरकारने केला आहे. राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित विशेष अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी हा दावा केला आहे.

राज्य सरकारने 2021 मध्ये सुरू केलेल्या ‘अत्यंत गरिबी निर्मूलन प्रोजेक्ट’ अंतर्गत 64,006 कुटुंब, अत्यंत गरीब म्हणून चिन्हांकीत केले होते. या चार वर्षांच्या योजनंतर्तगत या कुटुंबांना निवास, अन्न, आरोग्य आणि उपजीविकेशी संबंधित मदत पुरविण्यात आली.

स्थानिक स्वराज्य मंत्री एम. बी. राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीति आयोगाच्या अध्ययनानुसार, केरळचा गरिबी दर देशातील सर्वात कमी म्हणजे 0.7 टक्के आहे. सर्वेक्षणात आम्हाला 64,006 कुटुंबांतील 1,03,099 व्यक्ती अत्यंत गरीब असल्याचे आढळले आणि त्यांना विविध योजनांशी जोडण्यात आले.

दरम्यान, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने (यूडीएफ) ने सरकारचा हा दावा “पूर्णपणे फसवणूक” करणारा असल्याचे म्हणत, विधानसभेतून वॉकआउट केले. तसेच, विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनी मुख्यमंत्र्यांचे हे विधान संसदीय नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप केला आहे.

यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री विजयन म्हणाले, “यूडीएफ जेव्हा फसवणुकीसंदर्भात बोलते, तेव्हा ते स्वतःच्या वर्तनाचा उल्लेख करत असतात. आम्ही जे सांगितले होते, ते करून दाखवले आहे.” 

English
हिंदी सारांश
Web Title : Kerala claims eradication of extreme poverty, a first in India.

Web Summary : Kerala's CM Vijayan declared the state free of extreme poverty, a national first. Aided by a state project, 64,006 families received support for housing, food, healthcare, and livelihood. The opposition disputes the claim, alleging deception, while the government stands by its achievement.
टॅग्स :KeralaकेरळChief Ministerमुख्यमंत्रीcongressकाँग्रेस