शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

केंद्र सरकारचे नवे खासगीकरण धोरण तयार, मंत्रिमंडळात होणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 5:29 AM

सूत्रांनी सांगितले की, बँकिंग आणि विमा क्षेत्रास ‘रणनीतिक क्षेत्र’ (स्ट्रॅटेजिक सेक्टर) म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. याचाच अर्थ दीर्घकालीन पातळीवर देशात सरकारी मालकीच्या प्रत्येकी चारच बँका आणि विमा कंपन्या राहतील. काही कंपन्यांचे विलीनीकरण आणि काहींची विक्री करून हे साध्य केले जाईल.

नवी दिल्ली :केंद्र सरकारचे नवे खासगीकरण धोरण तयार असून, त्यावर मंत्रिमंडळ येत्या काही आठवड्यांत चर्चा करील, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. एका उच्चस्तरीय सरकारी अधिकाºयाने सांगितले की, ४९ केंद्रीय मंत्रालये आणि विभाग यांना ‘मंत्रिमंडळ टिपण’ अभ्यासासाठी देण्यात आले होते. त्यावर सूचना आल्या. मात्र, आता अंतिम टिपण तयार झाले आहे. हे टिपण १0 ते १५ दिवसांत विचारार्थ घेतले जाऊ शकते.

सूत्रांनी सांगितले की, बँकिंग आणि विमा क्षेत्रास ‘रणनीतिक क्षेत्र’ (स्ट्रॅटेजिक सेक्टर) म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. याचाच अर्थ दीर्घकालीन पातळीवर देशात सरकारी मालकीच्या प्रत्येकी चारच बँका आणि विमा कंपन्या राहतील. काही कंपन्यांचे विलीनीकरण आणि काहींची विक्री करून हे साध्य केले जाईल.

रेल्वे, तेल व गॅस, संरक्षण, अंतराळ आणि अणुऊर्जा या क्षेत्रांनाही रणनीतिक क्षेत्र म्हणून मान्यता दिली जाईल. या क्षेत्रातही विलीनीकरण आणि खासगीकरण राबवून सरकारी कंपन्यांची संख्या चारवर मर्यादित केली जाईल. वित्तमंत्री सीतारामन यांनी ‘आत्मनिर्भर भारत पॅकेज’ अंतर्गत ‘रणनीतिक क्षेत्र’ धोरणाची घोषणा केली होती. रणनीतिक क्षेत्रात सरकारी मालकीच्या कंपन्यांची संख्या चारपेक्षा जास्त असणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. सीतारामन यांनी म्हटले होते की, सरकारी कंपन्यांची संख्या अधिक राहू नये यासाठी अधिसूचित ‘रणनीतिक क्षेत्रा’त विलिनीकरण आणि एकीकरण प्रक्रिया राबविली जाईल.

सीतारामन यांनी ही घोषणा करताना नव्या खासगीकरण धोरणासाठी कोणतीही कालमर्यादा सांगितली नव्हती. एका अधिकाºयाने सांगितले की, सरकारी कंपन्यांची संख्या कमी कधी करावी, यासाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा नाही. ‘बिगर-रणनीतिक’ क्षेत्रातून सरकार पूर्णपणे बाहेर पडणार आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा