शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
2
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
3
"हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
4
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
5
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
6
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
7
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
8
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
9
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
10
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
11
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
12
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
13
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
14
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
15
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
16
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
17
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
18
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
19
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
20
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

'वर्दीतला माणूस'... 8 वर्षापूर्वी सापडलेल्या अनाथ मुलीचं 'पोलीस बापानं केलं कन्यादान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 20:38 IST

जानकपूरम येथील रहिवाशी असलेले अखिलेश सध्या चौक ठाण्यात पोलीस निरीक्षक आहेत.

नवी दिल्ली - पोलिसांबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात नेहमीच भीती असते. तसेच, पोलीस म्हणजे भ्रष्टाचारी, गरिबांची पिळवणूक करणारे असाही समज अनेकांचा असतो. मात्र, काही पोलीस आपल्या कृतीतून पोलिसांबद्दलचा हा समज पुसून टाकतात. उत्तर प्रदेशमधील एका पोलीस अधिकाऱ्यानेही पोलिसांबद्दल लाख-मोलाचा आदर वाटावा, असे कृत्य केले आहे. लखनौच्या चौक ठाण्यातील अखिलेश मिश्र यांनीही आपल्या खाकी वर्दीत लपलेला माणूस समाजाल दाखवून दिला आहे. 

लखनौ चौक ठाण्यातील पोलीस निरीक्षक अखिलेश मिश्र यांना आठ वर्षांपूर्वी एक अनाथ मुलगी भेटली होती. त्यावेळी गुडम्बा पोलीस ठाण्यात अखिलेश आपले कर्तव्य बजावत होते. या कर्तव्यावर असताना भेटलेल्या 10 वर्षीय मुलीला अखिलेश यांनी सोबत घेऊन आपल्या मुलीप्रमाणे सांभाळले. विशेष म्हणजे नुकतेच या मुलीचे लग्न लावून अखिलेश यांनी कन्यादानही केले. जौनपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या लग्नसोहळ्याला पोलीस खात्यातील लोकांसह अनेकांनी मोठी गर्दी केली होती. 

जानकपूरम येथील रहिवाशी असलेले अखिलेश सध्या चौक ठाण्यात पोलीस निरीक्षक आहेत. जवळपास 8 वर्षांपूर्वी गुडम्बा ठाण्यात कर्तव्य बजावत असताना, अखिलेश यांना भटंकती करणारी 10 वर्षीय मुलगी भेटली होती. त्यावेळी, अखिलेश यांनी मुलीला तिच्याबद्दल विचारपूस केली. मात्र, तिला काहीही सांगता आले नाही, तर पोलीस यंत्रणांचे सहकार्य घेऊनही तिच्या कुटुंबीयांबद्दल अखिलेश यांना काहीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे अखिलेश यांनी अखेर तिला आपल्या घरी आणले. अगोदरच, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार असलेल्या अखिलेश यांनी कुटुंबातील पाचवे अपत्य बनवून या अनाथ मुलीच्या पित्याची जबाबदारी निभावली. 

अखिलेश यांनी तनु मिश्रा असे या मुलीचे नाव ठेऊन तिला शिक्षणही दिले. त्यानंतर, मुलगी लग्नायोग्य होताच, जौनपूर येथील घनश्याम उपाध्याय यांचा मुलगा पंकजसोबत तिचे लग्न लाऊन दिले. गेल्या महिन्यातील 20 एप्रिल रोजी हा विवाहसोहळा पार पडला. अखिलेश यांनी आपल्या तुलापूर या मूळगावी वडिलांची जबाबदारी पार पाडत तनुचे थाटामाटात लग्न लावले. त्यामुळे अखिलेश यांच्या या कृतीचे संपूर्ण पोलीस दल आणि जिल्ह्यातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे. दरम्यान, आपल्या कुटुंबापासून दूरावल्यानंतर तनुला मानसिक धक्का बसला होता. मात्र, अखिलेश यांच्या कुटुंबात मला खूप प्रेम मिळाल, या मी या कुटुंबाचाच भाग बनले. त्यामुळे अखिलेश हे माझ्यासाठी केवळ वडिल नसून देवच असल्याचं तनुने लग्नावेळी म्हटले. अखिलेख यांच्या एका कृतीमुळे संपूर्ण पोलीस दलाबद्दल कृतज्ञता वाढीस लागली असून समाजाने वर्दीतली माणूसकी पाहिली आहे. 
 

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशlucknow-pcलखनऊ