ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 12:23 IST2026-05-05T12:18:54+5:302026-05-05T12:23:25+5:30

Sanjay Raut Opinion on West Bengal ELection Results 2026: इंडिया आघाडीला सगळ्यात जास्त धक्का दिला तो पश्चिम बंगालच्या निकालाने. भाजपाने तब्बल २०६ जागा जिंकत ममता बॅनर्जींना सत्तेवरून खाली खेचले. या निकालावर आता खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली. 

Mamata Banerjee lost West Bengal! Sanjay Raut told India Aghadi, "Now we should support Mamata Banerjee" | ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."

ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."

Sanjay Raut Mamata Banerjee Rahul Gandhi: उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक निकालावर भाष्य करणारी एक पोस्ट शेअर केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे लक्ष वेधून घेत खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालमधील निकालाबद्दल काही मुद्दे मांडले आहेत. यात त्यांनी एकूण निवडणूक प्रक्रियेवरच गंभीर शंका उपस्थित केल्या असून, आता ममता बॅनर्जींना साथ द्यायला हवी, असे आवाहन केले आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव भाजपाने केला नाही, तर निवडणूक आयोग, केंद्रीय सुरक्षा दले आणि सुमारे तीस लाख मतदारांना मताधिकार नाकारण्याने केला आहे."

महाराष्ट्राचा उल्लेख करत राऊत म्हणाले, 'निवडणूक चोरली'

पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले की, "ही निवडणूक जिंकली गेली नाही, तर चोरली गेली आहे. आपण ममता दीदींबरोबर उभे राहिले पाहिजे. महाराष्ट्रात, बिहारात, हरयाणात, आसामात, ओडिशात अशाच प्रकारे निवडणूक चोरण्यात आली. या अशा विजयाचे ढोल फुटायला हवेत. जागे व्हा", असे संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी आणि राहुल गांधींचा उल्लेख करत म्हटले आहेत.

अरविंद केजरीवालांनाही निकालावर शंका

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या निकालाबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. "जी दिल्ली आणि पश्चिम बंगाल भाजपाला मोदी लाट शिखरावर असताना जिंकता आले नाही. २०१५ साली दिल्लीमध्ये आणि २०१६ साली बंगालमध्ये  प्रत्येकी तीन जागा मिळाल्या. त्या दिल्ली आणि बंगालमध्ये भाजपाने अशा काळात विजय मिळवला, जेव्हा मोदींची लोकप्रियता संपूर्ण देशात तळाला चालली आहे, असे कसे?", असा सवाल केजरीवालांनी उपस्थित केला आहे. 

Web Title : ममता बनर्जी ने बंगाल खोया! संजय राउत ने राहुल से कहा, "अब जागो!"

Web Summary : संजय राउत ने पश्चिम बंगाल चुनावों में गड़बड़ी का आरोप लगाया, दावा किया कि भाजपा ने निष्पक्ष रूप से जीत हासिल नहीं की। उन्होंने राहुल गांधी और अन्य से ममता बनर्जी का समर्थन करने का आग्रह किया, अन्य राज्यों में भी इसी तरह की चुनावी कदाचार का आरोप लगाया। केजरीवाल ने मोदी की घटती लोकप्रियता के बीच भाजपा की जीत पर भी सवाल उठाया।

Web Title : Mamata lost Bengal! Sanjay Raut tells Rahul, "Wake up now!"

Web Summary : Sanjay Raut alleges foul play in West Bengal elections, claiming the BJP didn't win fairly. He urges Rahul Gandhi and others to support Mamata Banerjee, alleging similar electoral malpractices in other states. Kejriwal also questions BJP's victory amid declining Modi popularity.