शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

मिठाईबाबतचा नवा नियम जाणून घ्या अन् बिनधास्त तोंड गोड करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 13:38 IST

मिठाई घेताना टेन्शन घेण्याची गरज नाही कारण मिठाई विकत घेताना त्याची एक्स्पायरी डेट ग्राहकांना समजणार आहे.

ठळक मुद्देमिठाई घेताना टेन्शन घेण्याची गरज नाही कारण मिठाई विकत घेताना त्याची एक्स्पायरी डेट ग्राहकांना समजणार आहे.FSSAI ने याबाबत आदेश काढला असून 1 जून 2020 पासून तो लागू होणार आहे. मिठाईवाल्यांना सुटी मिठाई कधी तयार केली याची माहिती द्यावीच लागणार.

नवी दिल्ली - सण, समारंभ अथवा घरामध्ये एखादं शुभ कार्य असल्यास तोंड गोड करण्यासाठी हमखास मिठाई आणली जाते. मात्र अनेकदा मिठाईमध्ये भेसळ असणं किंवा ती जुनी असल्याने तशी मिठाई खाणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. मात्र आता मिठाई घेताना टेन्शन घेण्याची गरज नाही कारण मिठाई विकत घेताना त्याची एक्स्पायरी डेट ग्राहकांना समजणार आहे. तसेच मिठाई कधी तयार करण्यात आली आणि ती कधीपर्यंत खाणं योग्य आहे याबाबतची सर्व माहिती ही लवकरच ग्राहकांना मिळणार आहे. 

सुट्या किंवा पॅकबंद नसलेल्या मिठाईच्या दर्जाबाबत ग्राहकांना माहिती मिळावी यासाठी सरकारने अशी पावलं उचल्याची माहिती मिळत आहे. FSSAI ने याबाबत आदेश काढला असून 1 जून 2020 पासून तो लागू होणार आहे. त्यामुळे मिठाईवाल्यांना सुटी मिठाई कधी तयार केली याची माहिती द्यावीच लागणार आहे. त्याशिवाय त्यांना मिठाई विकता येणार नाही. पॅकबंद नसलेल्या गोड पदार्थांची विक्री करताना ते पदार्थ कधी तयार केले याची तारीख तसेच किती तारखेपर्यंत वापरावेत याचा ठळक उल्लेख करणे. FSSAI बंधनकारक केले आहे. 

अनेकदा मुदत संपलेल्या वस्तू या विकल्या जातात. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या या निर्माण होऊ शकतात. हाच धोका लक्षात घेऊन FSSAI ने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांच्या हितासाठी देशातील सर्व मिठाई विक्रेत्यांना ही मिठाई कधी तयार केली व किती तारखेपर्यंत वापरता येतील, या दोन्ही तारखांचा उल्लेख त्या पदार्थांच्या दुकानात मांडल्या जाणाऱ्या ट्रेवर ठळकपणे नमूद करणे बंधनकारक राहणार आहे. 

जगातल्या सर्वात हलक्या मिठाईचं वजन तुम्हाला माहीत आहे का?मिठाईच्या शौकीनांना नेहमीच मिठाईंबाबतच्या वेगवेगळ्या गोष्टींची उत्सुकता असते. अशीच मिठाईबाबतची एक खास बाब आम्ही त्यांच्यासाठी घेऊन आलो आहोत. अनेकांना माहीत नसेल की, जगातल्या सर्वात हलक्या मिठाईचं वजन किती आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सर्वात हलक्या मिठाईचं वजन केवळ 1 ग्रॅम आहे आणि यात 90 टक्के केवळ हवा आहे. म्हणजे या मिठाईने तोंड गोड करण्यासाठी यात केवळ 4 टक्के पदार्थ टाकले आहेत. ब्रिटनच्या कारागिरांनी ही मिठाई तयार केली आहे. खास बाब ही आहे की, या मिठाईला तयार करण्यासाठी वैज्ञानिकांची खास मदत घेण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Violence : हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत, आगडोंबात 20 जणांचा मृत्यू

Delhi Violence:...म्हणून मी त्या दंगलखोराला समोरा गेलो, पोलिसाने सांगितले कारण  

Delhi Violence:...त्या एका गोष्टीमुळे वादाची ठिणगी पडली, हिंसाचाराच्या आगडोंबाने दिल्ली पेटली

Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?'

Balakot Air Strike: बालाकोट एअर स्ट्राईकला वर्षपूर्ती, काय झालं होतं 'त्या' मध्यरात्री?; वाचा संपूर्ण कहाणी 

 

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागfoodअन्न