शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 5:46 PM

Lok Sabha Election 2024 : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. जर नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर देशातील परिस्थिती निराशाजनक असती असं म्हणत निशाणा साधला आहे. राज्याच्या बारपेटा येथील निवडणूक रॅलीदरम्यान आसामच्या मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं आहे.

'इंडिया टुडे' या इंग्रजी वेबसाइटच्या वृत्तानुसार, हिमंता बिस्वा सरमा यांनी रॅलीला संबोधित करताना मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात केलेल्या विकासकामांचा उल्लेख केला. सरमा यांनी कोरोना व्हायरसच्या साथीच्या काळात लसी आणि औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेचे कौतुक केलं. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व नसते तर देशातील परिस्थिती गंभीर होऊ शकली असती असं म्हटलं आहे. 

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उचललेल्या पावलांसाठी मोदी सरकारचं भरभरून कौतुक केलं. 2014 नंतर बोडो आणि कार्बी आंदोलनांमध्ये घट झाली, त्यामुळे प्रादेशिक मुद्द्यांमध्ये प्रगती झाली. याचे श्रेय केंद्रीय नेतृत्व आणि मोदी सरकारला जाते. महिला बचत गटांना जिओ टॅगिंगचे काम सोपवण्याची योजना त्यांना अधिक सक्षम करेल असं देखील सांगितलं आहे. 

चार जागांसाठी होणार मतदान 

आसाममध्ये लोकसभेच्या एकूण 14 जागा आहेत. पहिल्या दोन टप्प्यात 10 जागांवर मतदान झाले आहे. उर्वरित चार जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात सात मे 2024 रोजी मतदान होणार आहे. त्यात गुवाहाटी, बारपेट, कोक्राझार आणि धुबरी या जागा आहेत. 2019 च्या निवडणुकीत आसाममध्ये भाजपाने नऊ जागा जिंकल्या होत्या.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी