शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 17:34 IST

Ahmedabad Plane Crash : आईचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्यानंतर वडील भारतात आले होते. पण आता विमान अपघातात त्यांचाही मृत्यू झाल्याने  ८ आणि ४ वर्षांच्या दोन्ही मुलींना मोठा धक्का बसला आहे.

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातामध्ये २६५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे नातेवाईक अहमदाबादमध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले असून त्याचा आक्रोश हेलावून टाकत आहे. याच दरम्यान मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.  

कॅन्सरने आईला हिरावून नेलं आणि आता विमान अपघातामुळे चिमुकल्यांच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ झाल्या आहेत. २६ मे रोजी मुलींच्या आईचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्यानंतर वडील भारतात आले होते. पण आता विमान अपघातात त्यांचाही मृत्यू झाल्याने  ८ आणि ४ वर्षांच्या दोन्ही मुलींना मोठा धक्का बसला आहे. आईच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत नाही तोपर्यंत त्यांना दुसरा धक्का बसला आहे. 

शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं

पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात आले

अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातात अर्जुन पटोलिया यांचा मृत्यू झाला. ३७ वर्षीय अर्जुन आपल्या पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात आले होते. पत्नी भारतीची तिच्या मृत्यूनंतरचे विधी गुजरातमध्ये करावेत अशी इच्छा होती. त्यामुळे अर्जुन यांनी वडोदऱ्यापासून ६० किमी अंतरावर असलेल्या पोईचा येथील नीलकंठधाम आणि अमरेली जिल्ह्यातील वाडिया या त्याच्या मूळ गावी नर्मदा नदीत तिच्या अस्थींचं विसर्जन केलं.

"तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव

अर्जुन लंडनला परतत असताना नशिबाने त्याला आणखी एक क्रूर धक्का दिला. अर्जुनची आई सुरतमध्ये राहते. अर्जुनचा चुलत भाऊ संजय म्हणाला, "माझी वहिणी भारतीची इच्छा होती की, तिचं अस्थीविसर्जन भारतात व्हावं, म्हणून अर्जुन भारतात आला होता. कधीच कल्पना केली नव्हती की काही दिवसांत अर्जुनवरही अंत्यसंस्कार करावे लागतील."

हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

अर्जुन २० वर्षांचा असताना युकेला गेला. तो गेल्या १७ वर्षांपासून लंडनमध्ये राहत होता. तिथे तो फर्निचरचं दुकान चालवत होता. तिथेच त्याचं लग्न झालं आणि त्यांना दोन मुली आहेत. भारती मूळची कच्छ जिल्ह्यातील होती आणि कुटुंब आता अहमदाबादमध्ये स्थायिक झाले आहे. अर्जुनचा धाकटा भाऊ गोपाळ हा सध्या लंडनमध्ये आहे. तो आता दोन्ही मुलींची काळजी घेत आहे.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAccidentअपघातAir Indiaएअर इंडिया