शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
3
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
4
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
5
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
6
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
7
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
8
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
9
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
10
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
11
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
12
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
13
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
14
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
15
राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!
16
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
17
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
18
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
19
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
20
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....

झारखंडमध्ये विरोधी पक्षातील सहा आमदारांचा भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 3:02 PM

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षांमधील सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे.

रांची - झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षांमधील सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. बुधवारी (23 ऑक्टोबर) सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. रांचीचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या सहा आमदारांनी भाजपाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी काँग्रेस अध्यक्ष सुखदेव भगत यांच्यासह मनोज यादव (काँग्रेस), कुणाल सारंगी (जेएमएम), जेपी भाई पटेल (जेएमएम), चमरा लिंडा (जेएमएम) आणि भानु प्रताप शाही (नौजवान संघर्ष मोर्चा) यांनी भाजपात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षाला यामुळे झटका बसला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुखदेव भगत आणि मनोज यादव आधीपासूनच भाजपाच्या रडारवर होते. भगत हे काँग्रेसचे विद्यमान पीसीसी प्रमुख रामेश्वर उरांव यांच्यावर नाराज होते. लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभव पत्करावा लागल्यामुळेच ते उरांव यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. 

महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा एकाच वेळी होईल, अशी शक्यता वाटत होती. मात्र झारखंडमधील निवडणूक ऑक्टोबरमध्ये जाहीर केली जाईल आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2020 पर्यंत आहे. 81 जागांसाठी या राज्यात निवडणूक होते. भाजपला 2014 मध्ये 37 जागा मिळाल्या होत्या. तसेच झाविमोचे 6 आमदार भाजपमध्ये गेले होते. झारखंड मुक्ती मोर्चाला 19 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला 7 जागा मिळाल्या होत्या. झारखंड विकास मोर्चाला 8 जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यातील 6 जणांनी भाजपला पाठिंबा दिल्याने केवळ दोनच जागा त्यांच्याकडे राहिल्या होत्या. भाजपाचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी झारखंडचा दौरा केला होता. 

सन 2000 मध्ये 15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी झारखंडची स्थापना झाली. पहिल्या मुख्यमंत्र्यापासून आदिवासी समाजाला प्राधान्य दिल्याचे दिसते. सध्याचे झारखंड विकास मोर्चाचे सर्वेसर्वा पहिले मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी हे तेव्हा भाजपाचे मोठे नेते मानले जात होते. त्यानंतर अर्जुन मुंडा, शिबू सोरेन, मधू कोडा आणि हेमंत सोरेन हेदेखील मुख्यमंत्री राहिलेले आहेत. भाजपच्या बहुमतावर सरकार चालवणारे सध्याचे मुख्यमंत्री रघुबर दास हे पहिले बिगर आदिवासी आहेत.

 

टॅग्स :JharkhandझारखंडBJPभाजपाcongressकाँग्रेस