शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! क्षणात होत्याचं नव्हतं झालं, २०० मीटर आधी मृत्यूने गाठलं; तरुणीसोबत घडलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 09:25 IST

विनीता बसच्या दरवाजाजवळ उभी होती आणि जयपूरमध्ये बस थांबण्याची वाट पाहत होती.

जयपूर टँकर अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये २२ वर्षीय विनीता हिचाही समावेश आहे. जेव्हा विनीताने जयपूरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढण्याऐवजी उदयपूरहून बस पकडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिला पुढे असं काही होईल याची कल्पनाच नव्हती. वृत्तसंस्थेनुसार, २५ डिसेंबर रोजी रुग्णालयात गंभीर भाजल्यामुळे मृत्यू झालेल्या तीन लोकांपैकी विनीता एक होती. २० डिसेंबर रोजी जयपूर-अजमेर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि एलपीजी टँकर यांच्यात झालेल्या धडकेनंतर लागलेल्या आगीत तिचा मृत्यू झाला. 

विनीता बसच्या दरवाजाजवळ उभी होती आणि जयपूरमध्ये बस थांबण्याची वाट पाहत होती, परंतु स्टॉपच्या काही मीटर अगोदरच, तीव्र ज्वाळांनी तिला वेढलं आणि ती गंभीररित्या भाजली. पाच दिवस एसएमएस हॉस्पिटलमध्ये आयुष्याशी झुंज दिल्यानंतर बुधवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. बुधवारी झालेल्या या घटनेत आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १८ वर पोहोचला आहे, तर १५ जणांवर उपचार सुरू आहेत.

विनीता उदयपूरला परीक्षेला बसण्यासाठी गेली होती आणि तिला शुक्रवारी सकाळी ट्रेन पकडायची होती, पण लवकर पोहोचेल असं वाटल्याने तिने गुरुवारी रात्री स्लीपर बसमध्ये चढण्याचा निर्णय घेतला. विनीताचे वडील रामचंद्र म्हणाले, मला तिच्याकडून फोन येण्याची अपेक्षा होती की, ती जयपूरला पोहोचली आहे. मला फोन आला, पण तो फोन अपघाताबद्दल होता. घटनेच्या वेळी विनीता बसच्या दरवाजाजवळ उभी होती. बस टँकरच्याच मागे होती.

वडील म्हणाले की, आग लागली तेव्हा तिने मला लगेच फोन केला. हे ऐकून मला धक्काच बसला. कॉल डिस्कनेक्ट झाला आणि काही वेळाने आम्हाला कळलं की ती गंभीर जखमी आहे. आग लागल्यानंतर विनीताने बसमधून उडी मारून काही अंतरापर्यंत धाव घेतली, मात्र तोपर्यंत ती गंभीररीत्या भाजल्याचं सांगितलं. ७० टक्के भाजल्याने तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

प्रतापगडचे रहिवासी रामचंद्र यांनी सांगितलं की, विनीता जयपूरमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती आणि तिथे तिच्या लहान बहिणीसोबत राहत होती. शवविच्छेदनानंतर कुटुंबीय मृतदेह घेऊन प्रतापगडला रवाना झाले. एसएमएस हॉस्पिटलचे अधीक्षक सुशील भाटी यांनी सांगितलं की, बुधवारी तिघांचा मृत्यू झाला. ते म्हणाले, आणखी तीन मृत्यूंसह आतापर्यंत एकूण १८ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. 

टॅग्स :Accidentअपघातfireआग