शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 07:01 IST

Iran War: युद्ध आणि तणावाचे काळे ढग आता भारतावर घोंगवत आहेत. युद्धामुळे उद्भवणाऱ्या संकटामुळे चीनमध्ये केवळ ६ लाख लोक गरिबीत जाण्याची शक्यता असताना, भारतात ही संख्या २५ लाखांवर जाण्याची भीती आहे.

नवी दिल्ली -  युद्ध आणि तणावाचे काळे ढग आता भारतावर घोंगवत आहेत. युद्धामुळे उद्भवणाऱ्या संकटामुळे चीनमध्ये केवळ ६ लाख लोक गरिबीत जाण्याची शक्यता असताना, भारतात ही संख्या २५ लाखांवर जाण्याची भीती आहे. पाकिस्तानमधील ४ लाख लोकांना याचा फटका बसणार आहे. प्रत्यक्षात युद्ध सुरू असलेल्या इराणमधील ५० लाख लोक गरिबीत जाण्याची भीती असून, त्यापाठोपाठ भारताचा क्रमांक असल्याची माहिती  संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी)च्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

सर्वाधिक फटका कुणाला? अहवालानुसार, भारतातील ९० टक्के रोजगार असंघटित क्षेत्रात आहे. त्यामुळे हॉटेल, अन्नप्रक्रिया, बांधकाम, स्टील व दागिने उद्योग, लघू व मध्यम उद्योग या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.  

अहवालात काय? आखाती देशांत ९३.७ लाख भारतीय कामगार आहेत. युद्धाचा परिणाम तेथील रोजगारावर झाला तर भारतात येणाऱ्या चलनात मोठी घट होईल.औषधाच्या किमतीत १० ते १५ % वाढ झाली, तर वैद्यकीय उपकरणांच्या खर्चात ५० % वाढ झाली.हिरे, दागिने, कापड आणि स्टील क्षेत्रातील उद्योगांना कच्च्या मालाची टंचाई व वाढीव वाहतूक खर्चाचा सामना करावा लागेल.

खरीप हंगामावर परिणामभारत गरजेच्या ९० टक्क्यांहून अधिक तेल आणि ४० टक्क्यांहून अधिक खतांची आयात पश्चिम आशियातून करतो. जर हा संघर्ष लांबला, तर आगामी ‘खरीप’ हंगामावर त्याचे गंभीर परिणाम होतील. युरिया उत्पादनासाठी लागणारा नैसर्गिक वायू आणि तयार खतांचा पुरवठा विस्कळीत झाल्यास शेतीचा खर्च वाढून अन्नधान्य महाग होऊ शकते.

महागाई, बेरोजगारीचे संकटइंधन, मालवाहतूक व कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होणार आहे. यामुळे खरेदी क्षमता कमी होत असून, अन्नसुरक्षेचा प्रश्न वाढत आहे. गरिबांची एकूण संख्या ३५ कोटींच्या पार जाण्याचा अंदाज आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : War to push 2.5 million Indians into poverty: Report

Web Summary : War-related crises may impoverish 2.5 million Indians, says UNDP. Unorganized sectors like hotels and construction will suffer most. Disrupted fertilizer imports will impact agriculture. Inflation and unemployment threaten food security, pushing poverty past 350 million.
टॅग्स :IranइराणWarयुद्धIndiaभारत