शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
3
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
4
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
5
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
6
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
7
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
8
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
9
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
10
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
11
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
12
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
13
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
16
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
17
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
18
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
19
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
20
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)

घुसमट होतेय! गुन्ह्याचा भागीदार व्हायचे नाहीय; संबित पात्रांना भिडणाऱ्या प्रवक्त्याने काँग्रेसचेच वाभाडे का काढले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 11:40 AM

gaurav vallabh Upset Resigne Congress: मी सकाळ संध्याकाळी सनातन विरोधी नारेबाजी करू शकत नाही तसेच देशाच्या विकासात योगदान देणाऱ्यांना शिवीगाळ करू शकत नाही. - गौरव वल्लभ

जमशेदपूर : भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रांसोबत टीव्ही डिबेटमध्ये जुगलबंदी करणाऱ्या काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आजवर काँग्रेसची बाजू घेऊन बोलणाऱ्या वल्लभ यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठविलेल्या राजीनाम्यात काँग्रेसचेच वाभाडे काढले आहेत. असे का घडले, वल्लभ हे काँग्रेसमध्ये काय अपेक्षा ठेवून आले होते? त्यांचा मोहभंग का झाला...

खर्गेंना लिहिलेल्या पत्रात, काँग्रेस पक्ष आज ज्या प्रकारे दिशाहीन होऊन पुढे जात आहे. यामुळे मला पक्षामध्ये चांगले वातावरण वाटत नाहीय. मी सकाळ संध्याकाळी सनातन विरोधी नारेबाजी करू शकत नाही तसेच देशाच्या विकासात योगदान देणाऱ्यांना शिवीगाळ करू शकत नाही. यामुळे मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे वल्लभ यांनी म्हटले आहे. 

गौरव वल्लभ यांनी 2019 मध्ये झारखंडमधील जमशेदपूर पूर्व येथून पहिल्यांदा निवडणूक लढवली. वल्लभ यांना 18 हजारांहून अधिक मते मिळाली आणि ते तत्कालीन सीएम रघुबर दास आणि सरयू रॉय यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर होते. यानंतर 2023 मध्ये राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उदयपूरमधून निवडणूक लढवली होती. वल्लभ यांचा भाजपच्या ताराचंद जैन यांच्याकडून 32 हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला होता. गौरव वल्लभ हे अर्थशास्त्रातील उत्तम तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापकही राहिले आहेत. त्यांनी एका डिबेटमध्ये भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांना विचारले होते की एक ट्रिलियनमध्ये किती शून्य आहेत, याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. जेव्हा पात्रा यांनी हा प्रश्न वारंवार टाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा वल्लभ यांनी 5 ट्रिलियनमध्ये 12 शून्य असतात, असे सांगितले होते. 

सत्य लपविणे हा गुन्हा आहे. मला अशा गुन्ह्याचा भागीदार व्हायचे नाहीय, अशा शब्दांत वल्लभ यांनी काँग्रेसमध्ये चाललेल्या गोष्टींवर भाष्य केले आहे. अयोध्येतील राम मंदिराबाबत काँग्रेसने घेतलेल्या पक्षाच्या भुमिकेने मला स्तब्ध केले होते. मी जन्माने हिंदू आहे आणि व्यवसायाने शिक्षक. पक्षाच्या या भुमिकेने मला अस्वस्थ केले. पक्षाचे आघाडीचे नेते नेहमीच सनातन विरोधी बरळत असतात. त्यावर पक्षाने मौन बाळगणे म्हणजे त्यांच्या जाचक गोष्टींना अनुमोदन दिल्यासारखे आहे. एकीकडे जातीय जनगणनेवर बोलतो तर दुसरीकडे दुसरीकडे संपूर्ण हिंदू समाजाला विरोध करताना दिसतो. यामुळे पक्ष विशिष्ट धर्माचा समर्थक असल्याचा चुकीचा संदेश जनतेमध्ये जात आहे. हे काँग्रेसच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे, असे वल्लभ यांनी म्हटले आहे. 

सध्या आर्थिक बाबींवर काँग्रेसची भूमिका नेहमीच देशातील संपत्ती निर्माण करणाऱ्यांना अपमानित करण्याची आणि त्यांचा गैरवापर करण्याची, त्यांना शिव्या देण्याची राहिली आहे. आर्थिक उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या विरोधात आपण झालो आहोत. यावर तर जगाने देशाला महत्व दिले आहे. आम्ही सत्तेत नसलो तरी देशहितासाठी पक्षाची आर्थिक धोरणे आमच्या जाहीरनाम्यातून आणि इतर ठिकाणी चांगल्या पद्धतीने मांडता आली असती, असे मला वाटत होते. म्हणून मी पक्षात आलो. माझ्यासारख्या जाणकाराला हे करता येऊ शकत नाही हे गुदमरल्यापेक्षा कमी नाही, अशी टीका वल्लभ यांनी केली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSambit Patraसंबित पात्रा