शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
3
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
4
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
5
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
6
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
7
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
8
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
9
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
10
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
11
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
12
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
13
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
14
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
15
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
16
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
17
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
18
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
19
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
20
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 16:28 IST

Rahul Gandhi News: तुम्ही त्या रचनेचा भाग आहात की त्या वादळाचे बळी?, अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली आहे.

Rahul Gandhi News: देशावर मोठे आर्थिक संकट येत आहे. आजपर्यंत झाले नाही, असे नुकसान होणार आहे. शेतकरी, मध्यमवर्गीय, गरिबांना याचा मोठा फटका बसणार आहे, असे सांगत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भीती व्यक्त केली. तसेच अदानी, अंबानी, मोदी यांना याची झळ बसणार नाही, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.

एक्सवरील एका पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणतात की, एक भयंकर आर्थिक वादळ घोंघावत आहे. मोदींनी १२ वर्षांत जी रचना उभारली, ती केवळ अदानी आणि अंबानींसाठीच होती. आणि आता तीच रचना कोसळण्याच्या मार्गावर आहे. त्यांना काही होणार नाही. त्यांच्याकडे बाहेर पडण्याचा मार्ग आहे. तुम्हाला फटका बसेल. तरुणांना, गरिबांना, मध्यमवर्गीयांना, शेतकऱ्यांना, मजुरांना, लहान व्यावसायिकांचे नुकसान होईल, जे या रचनेचा कधीच भाग नव्हते. तुमच्या आजूबाजूला पाहा. तुम्ही त्या रचनेचा भाग आहात, की त्या वादळाचे बळी? अशी विचारणा राहुल गांधी यांनी एक्स पोस्टमध्ये केली आहे. या एक्स पोस्टसोबत शेअर केलेल्या व्हिडिओत केंद्र सरकारच्या धोरणांवर राहुल गांधी यांनी टीका केली आहे. 

गेल्या अनेक वर्षांत झाले नाही, इतके मोठे नुकसान होणार आहे

आर्थिक मंदीचे वादळ येत आहे. अदानी आणि अंबानी ढाचा त्यांनी तयार केला आहे. तो पूर्णपणे कोसळणार आहे. दुःखद गोष्ट ही आहे की, सामान्य जनतेचे मोठे नुकसान होणार आहे. याचा अर्थ ते आपल्या महालात बसून राहतील आणि तरुणांचा याचा मोठा फटका बसेल. अदानी आणि अंबानी यांना आर्थिक झळ बसणार नाही. मोदींवर याचा प्रभाव होणार नाही. देशातील युवा, शेतकरी, कामगार, लघु उद्योगांना याचा मोठा फटका बसणार आहे. गेल्या अनेक वर्षांत झाले नाही, इतके मोठे नुकसान होणार आहे. खूप कठीण काळ येत आहे. यावर काही उपाययोजना करायचे सोडून नरेंद्र मोदी देशाला सांगत आहेत की, परदेशात जाऊ नका आणि स्वतः नरेंद्र मोदी परदेश दौरे करत आहेत, असे राहुल गांधी यांनी मीडियाशी बोलताना म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिका इराण युद्ध आणि आखाती देशातील वाढता संघर्ष याचा मोठा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थांवर होताना पाहायला मिळत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक निर्बंधांमुळे तेल पुरवठ्याच्या साखळी विस्कळीत झाली आहे. यामुळे अनेक देशांना कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तेल संकटामुळे अनेक देशांमधील अंतर्गत व्यवहार ठप्प होताना दिसत आहेत. तेल आणि ऊर्जा संकटामुळे जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर नकारात्मक परिणाम होताना पाहायला मिळत आहे. भारतालाही याच्या झळा बसत असल्याचा दावा केला जात आहे. यावरून विरोधक केंद्र सरकार, भाजपावर टीका करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi warns of economic crisis, blames Modi's policies

Web Summary : Rahul Gandhi warns of a looming economic crisis, blaming Modi's policies that favor Ambani and Adani. He claims the poor and middle class will suffer the most from the impending recession and rising global tensions.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारEconomyअर्थव्यवस्थाIndiaभारतcongressकाँग्रेसFuel Crisisइंधन टंचाई