शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
8
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
9
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
10
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
11
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
12
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
13
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
14
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
15
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
16
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
17
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
18
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
19
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
20
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

'इंधनाचे दर वाढणार; भारताला युद्धाची किंमत मोजावी लागेल', राहुल गांधींचा मोदी सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 19:01 IST

'युद्धामुळे भारतात इंधनाचे दर वाढू शकतात, देशाच्या आर्थिक वाढीवरही परिणाम होऊ शकतो.'

नवी दिल्ली: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षावरून काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी इशारा देत म्हटले की, अमेरिका, इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाची किंमत भारताला मोजावी लागू शकते. राहुल गांधी यांच्या मते, या युद्धामुळे भारतात इंधनाचे दर वाढू शकतात तसेच देशाच्या आर्थिक वाढीवरही परिणाम होऊ शकतो.

जागतिक शक्तींमधील रणनीतिक स्पर्धा

राहुल गांधी म्हणाले की, वरकरणी हा संघर्ष अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील वाटत असला तरी, प्रत्यक्षात तो अमेरिका, चीन आणि रशिया यांच्यातील जागतिक रणनीतिक स्पर्धेचे प्रतिबिंब आहे. अमेरिका जागतिक महासत्ता म्हणून आपली आघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, तर चीन वेगाने प्रगती करत असून त्या अंतराला कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

ऊर्जा पुरवठ्यावर वाढता ताण

राहुल गांधी यांनी सांगितले की, मध्यपूर्व हा जगातील ऊर्जा उत्पादनाचा मोठा केंद्रबिंदू आहे. या भागातील तणावामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर दबाव वाढत आहे. होर्मुज सामुद्रधुनी हा जगातील तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. येथे तणाव वाढल्यास त्याचे परिणाम केवळ या प्रदेशापुरते मर्यादित न राहता जगभर जाणवतील.

भारतावर मोठा परिणाम होण्याची शक्यता

राहुल गांधी यांनी असेही म्हटले की, मोठ्या शक्तींच्या संघर्षाचा परिणाम इतर देशांनाही भोगावा लागतो. विशेषतः भारतासारख्या देशांवर त्याचा अधिक परिणाम होऊ शकतो, कारण भारताचे मध्यपूर्वेतील ऊर्जा आयातीवर मोठे अवलंबित्व आहे. भारतात वापरल्या जाणाऱ्या तेलाचा मोठा हिस्सा याच प्रदेशातून आयात केला जातो.

इंधन महागण्याचा इशारा

जर मध्यपूर्वेतील तणाव दीर्घकाळ कायम राहिला, तर ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढू शकतात आणि त्याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरांवर होऊ शकतो. यामुळे देशाच्या आर्थिक विकासाचा वेगही मंदावण्याची शक्यता असल्याचे राहुल गांधी यांनी नमूद केले.

भारताने स्पष्ट भूमिका घ्यावी

या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी भारताने या परिस्थितीत अत्यंत सावधपणे पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, हा केवळ इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष नसून जागतिक पातळीवर मोठ्या बदलांचे संकेत देणारी परिस्थिती आहे. जग अधिक अस्थिर आणि धोकादायक टप्प्यात प्रवेश करत असल्याने भारताने आपली धोरणात्मक भूमिका स्पष्ट ठेवणे आवश्यक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : War's Cost: Rahul Gandhi Warns Fuel Price Hike for India

Web Summary : Rahul Gandhi warns India faces rising fuel costs and economic slowdown due to Middle East tensions, a reflection of global power struggles. He urges strategic caution.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाCrude Oilखनिज तेलNarendra Modiनरेंद्र मोदी