शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
2
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
3
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
4
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
5
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
6
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
7
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
8
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
9
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
10
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
11
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
12
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
13
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
14
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
15
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
16
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
17
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
18
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
19
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!

"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 10:07 PM

PM Modi Patiala Rally Speech: "काँग्रेसने सत्तेसाठी देशाचे विभाजन केले. फाळणीही अशा प्रकारे केली की, करतारपूर साहिब पाकिस्तानात गेले."

PM Modi Patiala Rally : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे, त्यामुळे प्रचाराचा जोरही तेवढाच वाढला आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये आयोजित एका जाहीर सभेतून काँग्रेसवर जोरदार हल्लाबो केला. "बांगलादेशविरोधात युद्ध झाले, तेव्हा 90 हजारांहून अधिक पाकिस्तानी सैनिक आपल्या ताब्यात होते. त्यावेळी मी असतो, तर करतारपूर साहिब भारताला दिल्याशिवाय पाकिस्तानी सैनिकांना सोडले नसते," असे मोदी यावेळी म्हणाले.

पटियाला येथे आयोजित जाहीर सभेत मोदी म्हणतात, "आमच्या सरकारने अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना सुखरुप परत आणले. काँग्रेसने सत्तेसाठी देशाचे विभाजन केले. फाळणीही अशा प्रकारे केली की, करतारपूर साहिब पाकिस्तानात गेले. 1971 च्या युद्धानंतर पाकिस्तानचे 90 हजारांहून अधिक सैनिक भारताच्या ताब्यात होते. त्यावेळच्या सरकारला हवे असते तर करतारपूर साहिब परत घेता आले असते, पण तसे झाले नाही. त्यावेळी मी असतो, तर आधी करतारपूर साहिब परत घेतले असते. 10 वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या आमच्या सरकारमुळे करतारपूर कॉरिडॉरचा मार्ग मोकळा झाला. त्यापूर्वी दूरवरुनच दर्शन करावे लागत होते."

गांधी कुटुंबावर निशाणा साधत मोदी पुढे म्हणाले, "1962 च्या युद्धात चीनच्या हातून भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. ज्यांच्यामुळे पराभवाला सामोरं जावं लागलं, ते लोक आता या पराभवासाठी लष्कराला जबाबदार धरतात. काँग्रेसला देश प्रिय नसून त्याची सत्ता प्रिय आहे आणि त्यासाठी ते काहीही करू शकतात." शेतकरी प्रश्नावर बोलताना पीएम मोदी म्हणतात, "इंडी आघाडीने शेतकऱ्यांना आश्वासने दिली, पण ती पूर्ण करण्याची तसदी घेतली नाही. आम्ही एमएसपीमध्ये अडीच पट वाढ केली. आमचे सरकार नैसर्गिक शेतीवर भर देत आहे. जे अण्णा हजारेंचा विश्वासघात करू शकतात, ते ना पंजाबची काळजी घेऊ शकतात आणि ना तुमच्या मुलांना काही देऊ शकतात" अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसAAPआप