शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
5
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
6
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
7
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
8
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
9
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
10
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
12
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
13
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
14
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
15
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
16
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
17
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
18
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
19
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
20
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

होऊ दे खर्च... लग्नासाठी ५०० कोटींचा खर्च; नवरी मुलीची साडीच होती कोट्यवधींची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 17:51 IST

कर्नाटकचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांची कन्या ब्राह्मणी हिचा हा विवाहसोहळा होता

लग्न म्हटलं की खर्च आलाच, गरीबातील गरीब माणसालाही लग्नसोहळ्यासाठी खर्च करावाच लागतो. म्हणून तर म्हणतात की माणूस आयुष्यभर पै पै जमा करतो आणि लेकरांच्या लग्नात ती खर्च करतो. कारण, लग्नासाठी काही खर्च हा अपरिहार्य असाच मानला जातो. मात्र, देशातील काही गर्भश्रीमंत लोकांच्या लग्नाची कथाही तितकीच उत्कंठावर्धक असते. मग, ते उद्योगपती अंबानींचं घराणं असो की एखाद्या सेलिब्रिटीचं लग्न असोत. सध्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे, कर्नाटकमधील एका माजी मंत्र्यांच्या मुलीचा लग्नसोहळ्याची आठवण आवर्जुन होतेय. या लग्न सोहळ्यासाठी तब्बल ५०० कोटी रुपयांचा खर्च झालाय. विशेष म्हणजे हे लग्न ७ वर्षांपूर्वी झालं होतं, पण आजही त्याची चर्चा होतेय. कारण, हा देशातील सर्वात महाग लग्नसोहळ्यांपैकी एक होता. 

कर्नाटकचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांची कन्या ब्राह्मणी हिचा हा विवाहसोहळा होता. या लग्नासाठी तब्बल ५०० कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात आला होता. ६ नोव्हेंबर २०१६ साली हे लग्न झालं होतं, तब्बल ५ दिवस हा लग्नसोहळा सुरु होता, ज्यामध्ये ५० हजारांपेक्षा अधिक लोकं सहभागी झाले होते. बंगळुरुमधील ५ स्टार आणि ३ स्टार हॉटेलमध्ये जवळपास १५०० पेक्षा जास्त रुम्स बुकींग करण्यात आल्या होत्या. तर, विवाहस्थळी ३ हजारांपेक्षा अधिक सुरक्षा रक्षक व पोलीस बंदोबस्त होता. 

लग्नात वधुने कांजीवरम साडी परिधान केली होती, ज्याची किंमत १७ कोटी रुपये एवढी होती. साडीवर सोन्याचा थ्रेड वर्क करण्यात आला होता. तर, लग्नासाठी ५ कोटी रुपयांचे दागिने मुलीच्या अंगावर होते. मुलीच्या मेकअपसाठी तब्बल ५० मेकअप आर्टीस्ट आल्या होत्या, त्यासाठी, ३० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. पाहुण्यांच्या ने-आण करण्यासाठी १५ हेलिकॉप्टर आणि २००० कार उभ्या होत्या. त्यासह ४० भव्य बैलगाडीवरुन पाहुणे मंडळी लग्नमंडपात येत होती. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्याची निमंत्रण पत्रिका एलईडी स्क्रीनद्वारे देण्यात आली होती. बॉक्स उघडल्यानंतर या स्क्रीवर एक व्हिडिओ चालत होता, जे लग्नाचे निमंत्रण देत होता. 

दरम्यान, जनार्दन रेड्डी हे तेव्हा कर्नाटकमधील भाजपचे मंत्री होते. नोटीबंदीनंतर काही दिवसांतच हा विवाहसोहळा संपन्न झाला होता. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या लग्नसोहळ्यासाठी करण्यात आलेल्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी केली होती. 
 

टॅग्स :Karnatakकर्नाटकmarriageलग्नBengaluruबेंगळूरDemonetisationनिश्चलनीकरण