शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
2
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
3
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
4
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
5
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
6
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
7
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
8
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
9
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
10
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
12
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
13
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
14
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
15
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
16
मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय?
17
अधिक मास २०२६: पुरुषसूक्त की विष्णुसहस्रनाम? अधिक मासात कोणते स्तोत्र ऐकणे ठरेल अधिक लाभदायी?
18
उडत्या विमानाचा फोटो काढणे पडले भयंकर महागात! दुबईत भारतीय तरुणाला थेट १० वर्षांचा तुरुंगवास
19
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
20
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात माहेरची २४ माणसं दगावली; तरीही डोळ्यातील अश्रू लपवत बापानं लावलं मुलीचं लग्न  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 12:30 IST

राजस्थानमध्ये एका वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात झाला. ही बस थेट नदीत कोसळल्याने 24 जणांचा मृत्यू झाला होता.

ठळक मुद्देमुलीच्या पाठवणीपर्यंत वडील दुहेरी भूमिकेत पाहायला मिळाले.बुंदीमधील कोटा लालसोट मेगा हायवेवर वऱ्हाडाची बस नदीत कोसळलीनवरीच्या माहेरची २४ माणसं या अपघातात दगावली

माधोपूर - बुधवारी सकाळी माधोपूर कोटा हायवेवर मेज नदीत बस कोसळल्याने २४ लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील प्रवासी माधोपूर येथील रहिवाशी रमेश चंद्र यांच्या मुलीच्या लग्नासाठी जात होते. ही घटना समजल्यानंतर अनेकांना धक्का बसला. पण नवरी आणि तिची आई लग्नाच्या समारंभात पूर्णपणे गुंग होते. लग्नाचे सर्व विधी पूर्ण करताना दिसले. कारण आपल्या कुटुंबातील वऱ्हाडी मंडळीचा अपघात झाल्याची भनकही त्यांना लागली नव्हती.  

जन्म आणि मृत्यू कधीही थांबत नाही असं म्हटलं जातं. बुधवारी सकाळी नीमचौकी येथील रहिवाशी रमेश आणि त्यांचे कुटुंब मुलीच्या लग्नाच्या धामधुमीत व्यस्त होते. संपूर्ण कुटुंब आनंदात होतं. संध्याकाळी मॅरिज गार्डन येथे मुलीच लग्न लागणार होतं. रमेश यांची पत्नी दुपारपासून लग्नासाठी येणाऱ्या वऱ्हाडी मंडळीची वाट पाहत होती. नवरीचे मामा-मामी, आजोबा त्याचसोबत कोटाहून येणारे नातेवाईक या सर्वांची वाट पाहिली जात होती. तेव्हा रमेशला फोन आला, मेज नदीमध्ये हायवेवरुन येणारी बस पाण्यात पडली आहे. त्यात प्रवास करणाऱ्या २७ जणांपैकी २४ जणांचा मृत्यू झाला त्यावेळी रमेशला धक्का बसला. 

ज्यावेळी रमेशला ही माहिती समजली तेव्हा तो गार्डनच्या एका बाजूला होता तर कुटुंब हॉलमध्ये लग्नाची तयारी करत होतं. काहीजण नाचत होते तर नवरा-नवरीचे लग्नापूर्वीचे विधी सुरु होते. सकाळी ११ वाजता कार्यक्रमासाठी रमेशची मुलगी सीमा आणि रमेशची पत्नी बादाम सज्ज झाल्या होत्या. अपघाताच्या बातमी ऐकून रमेश सुन्न अवस्थेत होता. त्याचवेळी आई-मुलगी आणि बाकीचे कुटुंब लग्नाच्या धावपळीत होते. 

या अपघाताची माहिती मिळताच तेथे उभे असलेले उर्वरित नातेवाईक काही वेळातच रमेशकडे आले. दुसरीकडे जयपूरहून वरात निघाली होती. रमेशच्या नातेवाईकांनी त्यावेळी रमेशला धीर देत मुलीचा विवाह संपन्न करण्याचा सल्ला दिला. मात्र ही गोष्ट नवरी आणि तिच्या आईला समजून न देणं आव्हानात्मक होतं. प्रत्येकाने ठरवले की काहीही झाले तरी आई व मुलीला या अपघाताची बातमी मिळणार नाही. चार सुज्ञ आणि जबाबदार लोकांनी या घटनेची माहिती नवरी आणि तिच्या आईपासून लपवण्यासाठी प्रयत्न केले अनेकांना त्यांच्यापर्यंत जाण्यापासून रोखले. 

रमेशने दैनिक भास्करशी बोलताना सांगितले की, त्यांची पत्नी व मुलगी दुपारी 3 वाजेपर्यंत वारंवार विचारत होते, सकाळी अकरा वाजता येणारं वऱ्हाड अद्याप का आलं नाही? यावर पत्नी बादाम यांची आईची तब्येत वाटेत येताना बिघडली त्यामुळे त्यांना उशीर झाला आहे. वयोवृद्ध आईची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब तिथेच अडकले आहे असं रमेशने सांगितले. दरम्यान, मुलगी व पत्नीचे मोबाइलही त्याच्याकडून घेण्यात आले. यामुळे, ते कोणाशीही थेट संवाद साधू शकले नाहीत.

सकाळी दहा वाजेपासून रमेश आपल्या मुलीच्या पाठवणीपर्यंत दुहेरी भूमिकेत पाहायला मिळाले. जेव्हा ते मुलगी आणि बायकोकडे गेले तेव्हा त्यांचा चेहरा पूर्णपणे आरामदायक आणि आनंदी दिसत होता, परंतु एका कोपऱ्यात आल्यानंतर कोणच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडताना दिसत होते. ज्यावेळी अपघाताची माहिती पत्रकारांना मिळाली त्यानंतर मीडियाचे लोक विवाहस्थळी पोहचले, तेव्हा रमेश यांनी हात जोडून सगळ्यांना इथं कोणाला काही माहित नाही अशी विनंती केली. त्यामुळे कोणीही शूट केलं नाही. संपूर्ण लग्न पार पडल्यानंतर रमेशचा बांध फुटला. 
 

टॅग्स :Accidentअपघातmarriageलग्न