शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
2
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
3
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
4
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
5
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
6
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
7
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
8
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
9
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
10
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
11
मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय?
12
अधिक मास २०२६: पुरुषसूक्त की विष्णुसहस्रनाम? अधिक मासात कोणते स्तोत्र ऐकणे ठरेल अधिक लाभदायी?
13
उडत्या विमानाचा फोटो काढणे पडले भयंकर महागात! दुबईत भारतीय तरुणाला थेट १० वर्षांचा तुरुंगवास
14
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
15
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
16
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
17
Mamata Banerjee : "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
18
दिवाळीच्या तोंडावर नोकरीवरून हाकलले; ६ महिन्यांनी त्याच कंपनीने डेटासाठी फोन केला अन्.. 
19
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
20
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
Daily Top 2Weekly Top 5

"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 14:31 IST

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, जर पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे सुरूच ठेवले, तर त्याला ठरवावे लागेल की त्याला भूभागाचा भाग बनून राहायचे आहे की इतिहासजमा व्हायचे आहे.

पाकिस्तानने जर दहशतवाद्यांना आश्रय देणे बंद केले नाही, तर त्यांना ठरवावे लागेल की त्यांना भूभागाचा भाग बनायचे आहे की इतिहासाचा, असा इशारा भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला दिला.  गेल्या वर्षी झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर'ला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी माणेकशॉ सेंटरमधील लष्करी कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारताची आक्रमक भूमिका पुन्हा एकदा जगासमोर मांडली.

'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ

गेल्या वर्षी ७ मे रोजी पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले होते. या कारवाई अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले होते. दोन्ही देशांमधील हा लष्करी संघर्ष ८८ तास चालला होता, यामध्ये हवाई दल, नौदल आणि लष्कराने एकत्र येत पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले होते. अखेर १० मे रोजी संध्याकाळी दोन्ही देशांमध्ये करार झाल्यानंतर ही लढाई थांबली.

आता या कारवाईला एक वर्ष पूर्ण होत असताना लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले आहे की, जर पाकिस्तानने आपली रणनीती बदलली नाही, तर आगामी काळात भारतीय लष्कर 'ऑपरेशन सिंदूर'पेक्षाही कितीतरी पटीने अधिक कठोर आणि वेगवान प्रत्युत्तर देईल.

पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा

पाकिस्तानने शांतता आणि विकासाचा मार्ग निवडायचा की दहशतवादाला पाठिंबा देत राहायचे, हे ठरवले पाहिजे. भारताला नेहमीच शांतता हवी आहे, परंतु जर पाकिस्तानने दहशतवाद पसरवणे सुरूच ठेवले, तर भारत त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असेही लष्कर प्रमुख म्हणाले.

भारतीय लष्कर आता पूर्णपणे सज्ज आहे. लष्करप्रमुखांनी सांगितले की, अशी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास लष्कर अधिक वेगाने आणि अधिक जोमाने प्रत्युत्तर देईल. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्यातील उत्कृष्ट समन्वयाचे प्रदर्शन केले. देशात दहशतवादाविरोधात शून्य-सहिष्णुता धोरण अवलंबले आहे. लष्कर कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

विधानाला एवढे का महत्व?

मागील वर्षी झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर'ला एक वर्षे पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर हे विधान समोर आले आहे. यातून पाकिस्तानला एक स्पष्ट संदेश जातो की, भारत विसरलेला नाही किंवा कमकुवत झालेला नाही. भारताची भूमिका आता पूर्वीपेक्षाही कठोर झाली आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही देशाला भारत आर्थिक, राजनैतिक आणि लष्करी प्रत्युत्तर देईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan: Choose survival or oblivion, Indian Army Chief warns.

Web Summary : Army Chief General Dwivedi warns Pakistan to stop harboring terrorists or face obliteration. Marking 'Operation Sindoor' anniversary, he asserted India's readiness for a stronger response if Pakistan persists with terrorism. India desires peace but will retaliate firmly against continued terror activities, he stated.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर