शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
4
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
5
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
6
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
8
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
9
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
10
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
11
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
12
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
13
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
14
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
15
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
16
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
17
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
18
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
19
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
20
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

Mamata Banerjee : "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 13:49 IST

TMC Mamata Banerjee : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता ममता बॅनर्जी पुन्हा एकदा आपल्या पक्षासाठी कामाला लागल्या आहेत.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता ममता बॅनर्जी पुन्हा एकदा आपल्या पक्षासाठी कामाला लागल्या आहेत. अनेक वर्षांनंतरचा हा सर्वात मोठा धक्का सहन करत तृणमूल काँग्रेस आता थेट सत्तेतून बाहेर पडली आहे. याच दरम्यान कोलकाता येथील कालीघाट इथल्या आपल्या निवासस्थानी ममता बॅनर्जी यांनी निवडणूक लढवलेल्या पक्षाच्या उमेदवारांसोबत एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली.

अभिषेक बॅनर्जी देखील या बैठकीला उपस्थित होते. निवडणुकीतील पराभवानंतर संघटनेत एकजुटीचा संदेश देणं हा या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे. पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला आहे की, तृणमूल काँग्रेस संघर्ष पाहून मागे हटणार नाही.

"ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या"

ममता बॅनर्जी यांनी नेत्यांच्या पक्षांतरावर उघडपणे भाष्य केलं. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, "ज्या नेत्यांना दुसऱ्या पक्षात जायचं आहे, त्यांना जाण्याचं स्वातंत्र्य आहेत. जे लोक दुसऱ्या पक्षात जात आहेत, त्यांना जाऊ द्या. मी पक्ष नव्याने उभा करेन. जे लोक माझ्यासोबत राहतील, त्यांना मी सांगू इच्छिते की, त्यांनी नुकसान झालेली पक्ष कार्यालयं पुन्हा सुरू करावीत, त्यांना रंग द्यावा आणि काम सुरू करावं. गरज पडल्यास मी स्वतः त्या कार्यालयांचं रंगकाम करेन. तृणमूल काँग्रेस कधीच झुकणार नाही." 

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरची ही पहिलीच मोठी आढावा बैठक असल्याचं म्हटलं जात आहे, ज्यामध्ये निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांना बोलावण्यात आलं होतं. ममता बॅनर्जी यांनी नेत्यांना निराश न होण्याचं आणि संघटना तळागाळात पुन्हा मजबूत करण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन केलं. 

"आम्ही कधीही झुकणार नाही"

या बैठकीनंतर टीएमसीच्या अधिकृत 'एक्स' (X) हँडलवर काही फोटो शेअर करण्यात आले. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "उमेदवारांनी कल्पनेपलीकडचे अत्याचार आणि सततच्या धमक्यांना न जुमानता धैर्याने निवडणूक लढवली." पक्षाने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, "तृणमूल काँग्रेस एका कुटुंबासारखी एकजुटीने उभी आहे. ज्यांनी जनतेचा कौल चोरला आहे, त्यांच्यासमोर आम्ही कधीही झुकणार नाही. शेवटी विजय सत्याचाच होईल."

केवळ ८० जागांवर विजय

विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. राज्यातील एकूण २९४ जागांपैकी पक्षाला केवळ ८० जागांवर विजय मिळवता आला. टीएमसीने २९१ जागांवर उमेदवार उभे केले होते, तर ३ जागा सहयोगी पक्ष बीजीपीएम (BGPM) ला दिल्या होत्या. सर्वात मोठा धक्का म्हणजे, निवडणूक लढवलेल्या २९१ उमेदवारांपैकी २११ उमेदवारांचा पराभव झाला. सर्वात जास्त चर्चा स्वतः ममता बॅनर्जी यांच्या पराभवाची होत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Let them go; TMC won't bow down: Mamata Banerjee roars

Web Summary : Following a setback in West Bengal, Mamata Banerjee rallied TMC candidates, urging unity. She declared that defectors are free to leave, vowing to rebuild the party and resist defeat, emphasizing perseverance and grassroots strengthening after securing only 80 seats.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसPoliticsराजकारणWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६west bengalपश्चिम बंगाल