शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आता संसदेवर धडकणार, 1 फेब्रुवारीला 'पायी मोर्चा' काढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 20:09 IST

Farmers to march towards Parliament on Budget day on February 1: शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला म्हणजेच 'प्रजासत्ताक दिनी' ट्रॅक्टर रॅली काढून आपला निषेध नोंदविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन  गेल्या ६० दिवसांपासून दिल्ली सीमेवर सुरूच आहे. याच आंदोलनातंर्गत शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला म्हणजेच 'प्रजासत्ताक दिनी' ट्रॅक्टर रॅली काढून आपला निषेध नोंदविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 

दरम्यान, दिल्ली पोलिसांकडून ट्रॅक्टर रॅलीसाठी परवानगी मिळाल्यानंतर आता दिल्ली सीमेवर आंदोलन करणारे क्रांतिकारक शेतकरी संघटनेचे नेते दर्शन पाल यांनी सोमवारी सांगितले की, १ फेब्रुवारीला शेतकऱ्यांकडून संसदेवर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, बजेट सत्राचा पहिला टप्पा २९ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान चालणार असून १ फेब्रुवारीला केंद्र सरकार आपले बजेट सादर करणार आहे. 

याआधी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सोमवारी एएनआयशी संवाद साधताना सांगितले की, प्रजासत्ताक दिनाखेरीज इतर कोणताही दिवस ट्रॅक्टर रॅलीसाठी निवडला असता, पण आता त्यांनी जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी व पोलीस प्रशासनासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे कोणतीही घटना घडू न देता शांततापूर्वक ट्रॅक्टर रॅली पार पाडली पाहिजे. 

तसेच, शेतकरी आंदोलन कधी संपेल या प्रश्नावर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर की आंदोलन लवकरच संपेल. "प्रत्येकाला आपला विरोध दर्शविण्याचा अधिकार आहे, आम्ही ज्यावेळी पाहिले शेतकऱ्यांची एक अल्प संख्या कृषी  कायद्याच्याविरोधात आंदोलन करत आहे. त्यावेळी आम्ही त्यांच्या समस्या ऐकण्याचा प्रयत्न केला आणि हा मुद्दा चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला. तसेच, हा मुद्दा होईल लवकरच सोडविला जाईल," असे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केले.

नवीन कृषी कायदे दीड ते दीड वर्षासाठी स्थगित करण्याचा सरकारचा प्रस्ताव एक “उत्तम ऑफर” आहे आणि निषेध नोंदवणाऱ्या शेतकरी संघटनांनी यावर फेरविचार करून आपला निर्णय कळविला जाईल, अशी आशा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले व्यक्त केली. दरम्यान, सरकार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यातील ११ व्या फेरीतील चर्चेही निष्फळ ठरली. दहाव्या फेरीच्या चर्चेत सरकारने नवीन कृषी कायदे दीड ते दीड वर्षासाठी स्थगित ठेवण्याची ऑफर दिली, पण हे शेतकरी संघटनांनी नाकारले.

११ व्या फेरीतील चर्चेच्या वेळी सरकारने शेतकरी संघटनांना प्रस्तावावर पुनर्विचार करण्यास व त्याच्या निर्णयाबद्दल जागरूक करण्यास सांगितले होते. सरकारने शेतकरी संघटनांना सर्वोत्तम ऑफर दिली आहे. मला आशा आहे की ते आपापसात चर्चा करतील आणि त्यांच्या निर्णयाबद्दल आम्हाला जागरूक करतील. एकदा त्याला याची जाणीव झाल्यावर आम्ही पुढे जाऊ, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीBudgetअर्थसंकल्प