शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक, ट्विटरचे सरकारशी संगनमत; सोनिया गांधी यांचा लोकसभेत आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 06:31 IST

सरकारने हा प्रकार तत्काळ रोखावा, अशी मागणीही त्यांनी केली.

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : सत्तारूढ पक्ष आणि  संबंधित संघटनांशी  संगनमत करून फेसबुक, ट्विटरसह सोशल मीडिया लोकशाहीचे अपहरण करीत आहे. लोकशाही आणि देशासाठी धोकादायक असे  राजकीय वातावरण देशात निर्माण करण्याचे काम करीत आहे, असा परखड आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी लोकसभेत शून्य प्रहरात केला. 

सरकारने हा प्रकार तत्काळ रोखावा, अशी मागणीही त्यांनी केली. सोशल मीडियाचा वापर लोकशाहीचे अपहरण करण्यासाठी केला जात आहे. देशातील निवडणूक राजकारणावर सोशल मीडिया कंपन्यांचा प्रभाव लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असेही त्या म्हणाल्या. 
लोकसभेत बोलताना त्यांनी भाजपचा थेट नामोल्लेख केला नाही; परंतु त्यांचा इशारा  मोदी सरकारकडेच होता. त्या म्हणाल्या की, सरकारच्या इशाऱ्यावर फेसबुक आणि ट्विटर देशात द्वेष पसरविण्याचे काम करीत आहे.

दुसऱ्या पक्षांना मात्र समान  संधी दिली जात नाही. फेसबुक आपल्याच नियमांकडे दुर्लक्ष करीत आहे.  अल् जजिरा आणि वॉलस्ट्रीट जर्नलचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, द्वेष निर्माण करणारे संदेश आणि पोस्टवर अंकुश लावण्यासंबंधीचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. समाजात फूट पाडणे, वैमनस्य, द्वेष निर्माण केले जात आहे.

पराभवाची होणार कारणमीमांसा
पाच राज्यांतील पराभवाची कारणमीमांसा व कोणते संघटनात्मक बदल करावेत याची जबाबदारी ५ नेत्यांवर. 
गोवा : रजनी पाटील, मणिपूर : जयराम रमेश
पंजाब : अजय माकन, उत्तर प्रदेश : जितेंद्रसिंह
उत्तराखंड : अविनाश पांडे

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस