शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

भय इथले संपत नाही, २१ जुलैपर्यंत कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता, भारताने या देशालाही टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 12:00 PM

२१ जुलैपर्यंत भारतात कोरोनाचा धोका वाढू शकतो असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रत्येकाने स्वत-ची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

कोरोना संकटापासून सुटका मिळवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून कोरोनावर लस शोधण्याचे प्रयोग सर्वच देश करत आहेत. अजूनतरी कोणाच्याही हाती यश आले नाही. त्यामुळे संपूर्ण जग कोरोनाच्या तावडीतून अजूनतरी सुटलेले नाही. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांचा वाढता आकडा पाहून अनेकांना धडकी भरली आहे. त्यात बरे होणा-या रुग्णांची संख्याही अधिक आहे. ही एक भारतासाठी दिलासादायक बातमी असतली तरी पावसाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.  मुख्य म्हणजे देशभरातील एकूण रुग्णांपैकी सर्वात जास्त रुग्ण हे एकट्या मुंबई शहरात आहेत.त्यामुळे येणारा काळ हा मुंबईकरांसाठी चिंतेचा ठरू शकतो.

मिशिगन युनिव्हर्सिटी ऑफ बायोस्टॅटिस्टिक्सचे आणि रोग तज्ज्ञ भ्रमर मुखर्जी यांनी एजन्सी रॉयटर्सला याबाबत सांगितले की, भारतातील परिस्थिती येत्या काळात आणखी गंभीर होऊ शकते, अशी माहिती तयार केलेल्या मॉडेलच्या माध्यमातून देण्यात आली आहे.भारतात अद्याप संसर्गाचे प्रमाण कमी झालेले नाही, सरकारी आकडेवारीनुसार भारतात कोरोनाची प्रकरणं 13 दिवसांनी दुप्पट होत आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमध्ये शिथिल करण्यात आलेले नियम अडचण वाढवू शकतात. २१ जुलैपर्यंत भारतात कोरोनाचा धोका वाढू शकतो असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रत्येकाने स्वत-ची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

चिंतेची बाब म्हणजे कोरोनाबाधितांच्या आकड्यात आता भारतानं इराणला मागे टाकले आहे. मिशिगन युनिव्हर्सिटी आणि जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सर्व्हेक्षणानुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यात भारतात 21 लाख लोकांना संसर्ग होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या अडचणी वाढू शकतात. तर, लॉकडाऊनचे नियम आणखी कडक करण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस