शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown : 'या' राज्यात शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून पुन्हा लॉकडाउन, फक्त आवश्यक सेवाच राहणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 22:44 IST

यापूर्वी पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रात लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढवला आहे.

ठळक मुद्देयापूर्वी पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.राज्यात शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून 13 जुलै सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाउनचा आदेश जारी करण्यात आला आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात 2,69,789 एवढे अॅक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत.

लखनौ - देशातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने आणि झपाट्याने वाढत आहे. यामुळे राज्य सरकारेदेखील आपापल्या राज्यांत लॉकडाउन वाढवत आहेत. आता उत्तर प्रदेशातही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने पुन्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत राज्यात शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून 13 जुलै सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाउनचा आदेश जारी करण्यात आला आहे. या काळात केवळ रुग्णालये आणि अत्यावश्यक सेवांची दुकानेच खुली राहतील.

उत्तर प्रदेशात वाढत चालेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्र मिळवण्याच्या दृष्टीने मुख्य सचिव राजेंद्र तिवारी यांनी लॉकडाउनचा आदेश जारी केला आहे. या काळात सर्व शहरी आणि ग्रामीण भागातील बाजार, मंड्या आणि कार्यालये बंद राहतील. मात्र, या काळात आवश्यक सेवा सुरूच राहतील. 

या काळात मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर बंदी राहणार नाही. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर वाहनांची ये-जा सुरूच राहील. तसेच रेल्वे सेवादेखील पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.

यापूर्वी पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रात लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढवला आहे. याकाळात 'मिशन बिगीन अगेन'अंतर्गत देण्यात आलेल्या सर्व सवलती आणि नियमांमधील शिथीलता कायम ठेवण्यात आली आहे.

देशातील या 8 राज्यांत 90 टक्के अॅक्टिव्ह रुग्ण -आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात 2,69,789 एवढे अॅक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत. यापैकी 90 टक्के रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आहेत.

देशातील 86 टक्के मृत्यू केवळ 6 राज्यांत -केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जीओएमने माहिती दिली, की देशातील 86 टक्के कोरोनाबाधितांचे मृत्यू हे केवळ, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या 6 राज्यांत झाले आहेत. तर 80 टक्के मृत्यू हे देशातील केवळ 32 जिल्ह्यात झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 7,67,296 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4,76,377 लोक बरे झाले आहेत. तर 21,129 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या -

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

CoronaVirus News : धक्कादायक! 'या' 8 राज्यांत कोरोनाचे तब्बल 90 टक्के रुग्ण, 86 टक्के मृत्यू फक्त 6 राज्यात

CoronaVirus : धक्कादायक! कोरोनाचं नव रूप आलं समोर, अधिक वेगानं लोकांना करतोय संक्रमित; पण...

कोरोना तर पहिली लाट; जगाला भोगावे लागतील दूरगामी परिणाम - चीनची धमकी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ