शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी पैसे नाहीत, या राज्याने केंद्राकडे केली पाच हजार कोटींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 18:18 IST

एकीकडे कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती आणि दुसरीकडे आर्थिक चणचणीचा सामना करत असलेल्या  दिल्ली सरकारला कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन देणे कठीण होऊन बसले आहे.

ठळक मुद्देकोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे देशातील उद्योगधंदे  गेल्या दोन महिन्यांपासून बहुतांश प्रमाणात बंद होतेमहसूलाचा ओघ आटल्याने अनेक राज्यांच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. त्यामुळे राज्यांना नियमित खर्च भागवणे कठीण झाले आहे. एकीकडे कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती आणि दुसरीकडे आर्थिक चणचणीचा सामना करत असलेल्या  दिल्ली सरकारला कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन देणे कठीण होऊन बसले आहे

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे देशातील उद्योगधंदे  गेल्या दोन महिन्यांपासून बहुतांश प्रमाणात बंद होते. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच महसूलाचा ओघ आटल्याने अनेक राज्यांच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. त्यामुळे राज्यांना नियमित खर्च भागवणे कठीण झाले आहे. दरम्यान, एकीकडे कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती आणि दुसरीकडे आर्थिक चणचणीचा सामना करत असलेल्या  दिल्ली सरकारला कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन देणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला पाच हजार कोटी रुपयांची मदत करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले की, दिल्ली सरकारला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी आणि कार्यालयीन खर्चाचा भार उचलण्यासाठी दरमहा ३ हजार ५०० कोटी रुपयांची गरज आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दिल्लीच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत जीएसटीच्या माध्यमातून केवळ ५००-५०० कोटी रुपयेच आले आहेत. तसेच अन्य माध्यमातून आलेल्या कमाईचा विचार केल्यास एकूण १७५० कोटी रुपयांचीच भर तिजोरीत पडली आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दिल्ली सरकारच्या करसंकलनामध्ये ८५ टक्क्यांनी घट झाली आहे. अशा परिस्थितीत आम्ही आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन कसे देऊ शकतो. सर्व खर्च भागवण्यासाठी आम्हाला सुमारे पाच हजार कोटी रुपयांची गरज आहे. त्यामुळे आम्ही वित्तमंत्र्यांना पत्र लिहून ही मदत रक्कम तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. त्या रकमेमधून आम्ही आपल्या डॉक्टरांना आणि अन्य कर्मचाऱ्यांना वेतन देऊ शकू.

 सिसोदिया यांनी सांगितले की, कुठुनही महसूल मिळत नाही आहे. केंद्राने जो मदतनिधी जाहीर केला होता त्यातूनही दिल्लीला काहीच मिळाले नाही. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अत्यावश्यक सुविधा वगळता अन्य सर्व उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे राज्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्थाdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकारArvind Kejriwalअरविंद केजरीवाल