शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारचा काटकसरीचा नारा

By admin | Updated: October 31, 2014 01:25 IST

सरकारी खर्चावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आता काटकसरीच्या धोरणाचा नारा दिला

नव्या नोक:या बंद : नोकरशहांच्या विदेश दौ:यावर र्निबध
नवी दिल्ली : सरकारी खर्चावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आता काटकसरीच्या धोरणाचा नारा दिला असून, एक वर्षापेक्षा जास्त काळ रिक्त असणा:या जागांवरील नोकरभरती ते नोकरशहांच्या पंचतारांकित हॉटेलमधील बैठकांर्पयत विविध गोष्टींना चाप लावण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी केली. 
महागाईस कारणीभूत ठरणा:या सरकारी तिजोरीतील वित्तीय तुटीच्या नियंत्रणासाठी सर्व पातळ्य़ांवर सुरू असलेल्या प्रयत्नाचाच हा एक भाग असल्याचे स्पष्ट करताना जेटली यांनी काही नेमक्या उपायोजना जाहीर केल्या आहेत. 
यानुसार, सरकारच्या ज्या विभागांमध्ये एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एखादे पद रिक्त असेल तर तिथे भर्ती करता येणार नाही. तसेच, ज्या विभागांनी पगार व भत्त्यांसदर्भात 33 टक्के बजेटचा टप्पा ओलांडला आहे, अशा विभागांना नवीन नोकरभरणा करता येणार
नाही. 
याचसोबत, सध्या नोकरशहांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार सरकारी कामासाठी देशात अथवा परदेशात प्रवास प्रथम श्रेणीने प्रवास करण्याची जी मुभा आहे, त्यालाही चाप लावण्यात आला आहे.
जेव्हा नोकरशहांना प्रवास करण्याची वेळ येईल तेव्हा सारासार विचार करून तो निर्णय घ्यावा असे स्पष्ट करतानाच अधिका:यांची बैठक असल्यास व्हीडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर प्रभावीपणो करण्यावर भर द्यावा असे स्पष्ट करण्यात आले आहे. 
तसेच या अधिका:यांना पंचतारांकित हॉटेलमधील बैठका घेण्यासही 
चाप लावण्यात आला 
आहे.
अधिकाधिक बैठका दालनात घ्याव्यात असे सुचित करण्यात आले आहे. तसेच, परदेशात बैठका आयोजित करण्यासही मनाई करण्यात आली आहे. याचसोबत, वाहन खरेदी करतानाही त्याचे निकष अधिक कडक करण्यात आले आहेत. यातून केवळ संरक्षण क्षेत्र व तपास यंत्रणांना वगळण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
तूट 4.1 टक्के राखण्याचे आव्हान
च्या उपाययोजना स्पष्ट करतानाच वित्तमंत्र्यांनी वित्तीय तुटीसंदर्भात ताजी आकडेवारीदेखील सादर केली. यानुसार, 2क्14-15 या आर्थिक वर्षात वित्तीय तूट 4.1 टक्के इतकी राखण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. तर, 2क्16-17 या आर्थिक वर्षार्पयत हीच तूट 3 टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. 
 
च्काटकसरीचे धोरण काटेकोरपणो अवलंबले तर वित्तीय तुटीचा आकडा किमान क्.3 ते क्.6 टक्क्यार्पयत आटोक्यात येऊ शकतो, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 
 
वित्तीय तुटीचे आव्हान मोठे आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा गती द्यायची असल्याने ज्या अनेक उपाययोजना केल्या जात आहेत, त्याचाच भाग म्हणून सरकारने काटकसरीच्या महत्त्वपूर्ण उपाययोजना सादर केल्या आहेत. 
- अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री