शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक...! इंग्रजांनी भारताकडून तब्बल तीन हजार लाख कोटींची संपत्ती लुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 09:19 IST

मेरिकेच्या राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इंग्रजांवर गंभीर आरोप केला होता.

नवी दिल्ली : अमेरिकेच्या राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इंग्रजांवर गंभीर आरोप केला होता. इंग्रजांनी भारताला 200 वर्षे ओरबाडले आणि तब्बल तीन हजार लाख कोटींची संपत्ती लुटल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी हा आकडा प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ उत्सव पटनायक यांच्या शोधनिबंधामधून घेतला आहे. गेल्या वर्षी हा अहवाल प्रसिद्ध झाला होता. 

या अहवालानुसार 1765 ते 1938 दरम्यान इंग्रजांनी भारतातून 45 ट्रिलियन डॉलरची संपत्ती लुटली होती. ब्रिटिश शासन काळात भारतातील एक्सचेंज रेट 4.8 अमेरिकी डॉलर प्रति पाऊंड होता. भारतातून जो पैसा ब्रिटनने चोरला तो हिंसाचारासाठी वापरण्यात आला. 1840 मध्ये चीनी घुसखोरी आणि 1857 मध्ये विद्रोह आंदोलनाला दाबण्यासाठी योजना बनविण्यात आली आणि यासाठीचा पैसाही भारतीयांकडून कर रुपात उकळण्यात आला. भारताच्या पैशांतूनच ब्रिटन अन्य देशांमधील लढाया लढत होता आणि कॅनडा, ऑस्ट्रेलियासारख्या देशाचा विकास करत होता. 

या भ्रष्ट व्यवस्थेमुळे भारतावर मोठा परिणाम झाला. जगासाठी भारत चांगला व्यवसाय करत होता, चांगला नफा कमावत होता. मात्र, इंग्रजांनी पुढील तीन दशके देश चालवू शकतील एवढा खजिना लुबाडला होता. भारताचा नफा ब्रिटेन लुटून नेत होता. जेव्हा भारतात 1847 मध्ये ब्रिटिशांनी ताबा घेतला तेव्हापासूनच नवीन टॅक्स आणि बाय सिस्टिम सुरू करण्यात आली. ईस्ट इंडिया कंपनीचे काम कमी झाले आणि भारतीय व्यापारी स्वत:च निर्यात करण्यासाठी तयार झाले. या व्यापाऱ्यांना विशेष काऊन्सिल बिलाचा वापर करावा लागायचा. हे एक वेगळे पेपर चलन होते, जे केवळ ब्रिटिश क्राऊनद्वारेच स्वीकारली जात होती. सोने किंवा चांदीच्या बदल्यात लंडनमध्येच ते घेता येत होते. 

जेव्हा हे बिल इंग्रजांकडे व्यापारी घेऊन जायचे तेव्हा त्यांना ते इंग्रजांकडून ते कॅश करावी लागत होती. या बदल्यात रुपये मिळायचे. ही तीच रक्कम होती जी व्यापाऱ्यांकडूनच टॅक्स म्हणून वसूल केलेली असायची. म्हणजेच व्यापाऱ्यांचा पैसा त्यांना परत दिला जात होता. मात्र, ते पेपर चलन घेण्यासाठी सोने, चांदी द्यावे लागत होते. याचाच अर्थ इंग्रजांना फुकटात सोने, चांदी मिळत होते आणि व्यापाऱ्यांना वाटायचे की हा पैसा त्यांनी कमावलेला आहे. शिवाय मालही कमी किंमतीत इंग्रजांना मिळत होता. हा माल ते इतर देशांत विकत होते. अशा प्रकारे लाखो कोटींचा नफा इंग्रजांनी लुटला. यामुळे भारताचे अतोनात नुकसान झाले आणि इंग्रज मालामाल झाले.  

टॅग्स :Englandइंग्लंडIndiaभारतAmericaअमेरिका