शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

"भारतानं आपलं वर्चस्व प्रस्थापित करावं, अन्यथा...", बांगलादेश हिंसाचारावर महंत राजू दास यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 15:06 IST

Bangladesh Crisis : बांगलादेशातील परिस्थितीबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. हनुमानगढीचे महंत राजू दास यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

Bangladesh Crisis : बांगलादेशातील परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. संसद भवन परिसरात ही सर्वपक्षीय बैठक झाली. या सर्वपक्षीय बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांगलादेशातील परिस्थितीबाबत सर्वांना माहिती दिली.

दुसरीकडे, बांगलादेशातील परिस्थितीबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. हनुमानगढीचे महंत राजू दास यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राजू दास यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिले की, "भारतानं बांगलादेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची, हीच वेळ आहे. अन्यथा बांगलादेश हा पाकिस्तानपेक्षा जास्त त्रास देईल. नरेंद्र मोदीजी, तुम्ही पुढे जा, संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे." तत्पूर्वी एका व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "हिंदूंनो, तुमचा कष्टाचा पैसा उद्या असाच लुटला जाईल. मग तुम्हाला काहीच मिळणार नाही. त्यामुळं आजच काहीतरी करा."

दरम्यान, बांगलादेशातील परिस्थितीबाबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना बांगलादेशातील परिस्थिती आणि भारत सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशातील परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आपल्या सरकारी निवासस्थानी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बांगलादेशातील संपूर्ण परिस्थितीची माहिती देण्यात आली. बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतात आलेल्या शेख हसीना यांच्यासोबतची भेट, बांगलादेशातील ताज्या राजकीय परिस्थिती आणि तेथील हिंसाचाराची सततची परिस्थिती याबद्दल माहिती दिली.

बांगलादेशात आंदोलकांनी हिंदूंना केलं लक्ष्यआरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये सुरू झालेला हिंसाचार शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यानंतरही थांबलेला नाही. दरम्यान, या आंदोलकांनी देशात सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अल्पसंख्याक हिंदू समाजाला लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे. आंदोलक जमावाकडून हिंदूंना त्रास दिला जात आहे. काहींच्या घरांची जाळपोळ करण्याच्या घटना घडल्या आहेत. तर काहींची दुकानं लुटण्यात आळी आहेत. यादरम्यान, मेहरपूर येथील इस्कॉन मंदिरामध्ये दंगेखोरांनी तोडफोड करून मंदिराला आग लावल्याचे वृत्त आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय