शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

NDA मधील घटकपक्षांचा संवाद तुटला?; लोक जनशक्ती पार्टी प्रमुखांनी केली बैठकीत 'ही' मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 19:08 IST

मार्च २०१८ मध्ये आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन टीडीपीने एनडीएपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. 

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या तिढ्यातून भाजपा आणि शिवसेना यांच्यातील तणाव वाढला. अखेर शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एनडीए अर्थात नॅशनल डेमोक्रेटिक आघाडीत सर्वकाही ठीक आहे असं चित्र दिसत नाही. शिवसेनेपाठोपाठ इतरही घटक पक्ष समोर येऊन बोलू लागले आहेत. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच गेल्या ३० वर्षात शिवसेना या बैठकीत सहभागी झाली नाही. 

या बैठकीनंतर लोक जनशक्ती पार्टीचे नवनियुक्त प्रमुख चिराग पासवान यांनी एनडीएमधील घटकपक्षांना एकत्र ठेवण्यासाठी एका संयोजकाची गरज असल्याचं सांगितले. घटकपक्षांमध्ये एकवाक्यता असली पाहिजे, त्यांच्यात संवाद असला पाहिजे यासाठी हा संयोजक नियुक्त करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पहिल्यांदा तेलुगू देशम पार्टी(TDP) ने एनडीएची साथ सोडली. त्यानंतर उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोकसमता पार्टीही वेगळी झाली. २०१८ च्या अखेर लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावर नाराज होत त्यांनी एनडीएपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मार्च २०१८ मध्ये आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन टीडीपीने एनडीएपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. 

सध्या बिहारमध्ये भलेही भाजपा आणि नितीशकुमार यांची जेडीयू पार्टीसोबत असेल पण या दोघांमधीलही वाद अनेकदा समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जेडीयूला मोदी यांच्या मंत्रिमंडळात एक कॅबिनेट पद देण्यावरुन नितीशकुमार नाराज झाले. त्यांनी मंत्रिपद घेण्यास नकार दिला पण एनडीएसोबत राहिले. 

वाजपेयी यांच्या काळात संयोजक होतेमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत एनडीएच्या घटकपक्षांमध्ये सुसंवाद ठेवण्यासाठी संयोजक नियुक्त होता. शरद यादव आणि जॉर्जं फर्नांडिससारखे नेते अनेक वर्ष यापदावर होते. २०१३ मध्ये जेडीयू आघाडीपासून वेगळे होऊन शरद यादव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एनडीएमधील संयोजक पद रिक्त आहे. 

२०१३ नंतर बदलली एनडीएची स्थिती२०१४ मध्ये नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा घटकपक्षाचे नेते सांगतात की, मोदी संसदेच्या प्रत्येक सत्रात एनडीएची बैठक बोलवतात आणि आघाडीबाबत काही तक्रारी समस्या सोडविण्याचे काम अमित शहा करतात. 

टॅग्स :prime ministerपंतप्रधानAmit Shahअमित शहाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा